एक्स्प्लोर
Advertisement
धोनीने विराटचा सल्ला ऐकला असता तर भारताचा पराभव टळला असता!
धोनीचा निर्णय डीआरएसच्या बाबतीत चुकला, असं क्वचितच होतं. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीचा एक निर्णय टीम इंडियाच्या अंगलट आला.
गुवाहटी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी सल्लामसलत करताना दिसतो. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीकडूनही एक अशी चूक झाली, जी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरु शकली असती.
डीआरएसचा वापर न करणं टीम इंडियाला महागात पडलं. पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हेनरिक्स फलंदाजी करत असताना चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करुन धोनीच्या हातात गेला. सर्व खेळाडूंनी यासाठी अपील केली. मात्र पंचांनी बाद नसल्याचा निर्णय दिला.
https://twitter.com/animesh452/status/917781943717998592
यानंतर विराटने तातडीने धोनीचा सल्ला घेतला. मात्र धोनीने डीआरएसची गरज नसल्याचं सांगितलं. काही वेळानंतर टीव्ही रिप्लेमध्ये दाखवल्यानंतर स्पष्ट झालं की, हेनरिक्स बाद होता. त्यामुळे टीम इंडियाने डीआरएसचा वापर केला असता तर हेनरिक्सला माघारी परतावं लागलं असतं.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात हेनरिक्सने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ 2 धावांवर असताना मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत त्याने नाबाद 62 धावा केल्या. हेनरिक्सच्या या खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion