महिला टी 20 चॅलेंज (Women T20 Challenge) स्पर्धेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ही स्पर्धा येत्या 23 मे ते 28 मे दरम्यान पुण्यात खेळवण्यात येणार आहे, अशी घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी केली आहे. कोरोना महामारीमुळं महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा ही खेळवण्यात आली नव्हती.


जय शाह म्हणाले की, "दोन वर्षानंतर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा पुण्याला या स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने खेळले जाणार आहे. पहिला सामना 23 मे, दुसरा सामना 24 मे आणि तिसरा सामना 26 मे ला खेळवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 28 मे ला होणार आहे." 


याआधी बीसीसीआयनं महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेचं आयोजन उत्तर प्रदेशच्या क्रिकेट असोसिएशनला मिळणार असल्याची घोषणा केली होती. तसेच हे सर्व सामने ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलॉसिटीमधील लखनऊमध्ये खेळवले जातील, असंही सांगितलं होतं. मात्र, बीसीसीआयनं आपल्या निर्णयात बदल केला असून हे सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले जाणार असल्याची घोषणा केली आहे. 



महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी नावानं तीन संघ मैदानात उतरणार आहे. सुपरनोव्हासनं 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद पटकावले होतं. तर, 2020 मध्ये ट्रेलब्लेझर्सचा संघ प्रथमच चॅम्पियन बनला. 2021 मध्ये कोरोनामुळं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं.


हे देखील वाचा-