एक्स्प्लोर

CSK साठी दिलासा, IPL आधी रहाणे-शार्दूल फॉर्मात परतले, रणजी फायनलमध्ये केली कमाल

मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर आज दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली. या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद 141 धावांची मजल मारली आहे.

Mumbai vs Vidarbha Final, Ranji Trophy Day 2 : मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर आज दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली. या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद 141 धावांची मजल मारली आहे. त्यामुळं या सामन्यात मुंबईची एकूण आघाडी 260  धावांची झाली आहे. रणजी चषकाच्या फायनलमध्ये शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात शार्दूल ठाकूरनं 75 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय एक विकेटही घेतली होती. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे यानं अर्धशतक ठोकलेय. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर फॉर्मात परतल्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात आनंदाचं वातावरण आहे. 

वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे 58 आणि अष्टपैलू मुशीर खान 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची अभेद्य भागीदारी रचली. अजिंक्यनं 109 चेंडूंमधली नाबाद 58 धावांची खेळी चार चौकार आणि एका षटकारानं सजवली. मुंबईच्या कर्णधाराचं यंदाच्या रणजी मोसमातलं हे केवळ दुसरं अर्धशतक ठरलं. मुशीर खानच्या 135 चेंडूंमधल्या नाबाद 51 धावांच्या खेळीला तीन चौकारांचा साज होता. त्याआधी, मुंबईनं विदर्भाला अवघ्या 105 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 119 धावांची मोठी आघाडी घेतली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुष कोटियननं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

अजिंक्यने डाव सावरला - 

विदर्भाला 105 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईल 119 धावांची आघाडी मिळाली. पण दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानी स्वस्तात माघारी परतले. विदर्भाचा संघ सामन्यात कमबॅक करेल असेच सर्वांना वाटत होते. पण कर्णधार अजिंक्य रहाणे यानं मुशीरला हाताशी धरत खडूस फलंदाजी केली. दोघांनी नाबाद 107 धावांची भागिदारी केली.  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर 51 धावांवर नाबाद होते. 

42 व्या जेतेपदाकडे मुंबईची वाटचाल - 

रणजी चषकाच्या फायनलवर मुंबईने वर्चस्व मिळावलं आहे. रणजी चषकाच्या इतिहासात मुंबई 48 वा फायनल सामना खेळत आहे. मुंबईने आतापर्यंत 41 वेळा रणजी चषकावर नाव कोरलं आहे. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने  42 व्या जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे विदर्भाला फक्त दोन वेळा रणजी चषकावर नाव कोरता आलेय. 

पहिल्या डावात शार्दूलची भन्नाट फटकेबाजी - 

जेतेपदच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डवत फक्त 224 धावांवर समाधान मानावे लागले. विदर्भाच्या माऱ्यापुढे मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली होती. मुंबईची अवस्था एकवेळ 6 बाद 111 अशी दैयनीय झाली होती. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दिग्गज स्वस्तात तंबूत परतले होते. पण त्याचवेळी शार्दूल ठाकूर संकटकाळात धावून आला. शार्दूल ठाकूर यानं झंझावती 75 धावांची खेळी केली. शार्दूलच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला.  विदर्भाचा डाव अवघ्या 105 धावांत संपुष्टात आला.  विदर्भाच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. शम्स मुलानी, तनुश कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Kumar Sangakkara : चेन्नईतून आलेल्या खेळाडूनं राजस्थानला दिला धोका, राजस्थान आयपीएलमधून बाहेर जाताच कुमार संगकारानं मागचं पुढचं सगळं उकरुन काढलं
राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूवर धोका दिल्याचा ठपका, कुमार संगकाराच्या आरोपानं खळबळ, BCCI काय करणार? 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rains: मुंबईवर ढगांची गर्दी, उपनगरांमध्ये भल्या पहाटे पावसाच्या सरी; पुढील तीन तास महत्वाचे, IMDचा अंदाज काय?
मुंबईवर ढगांची गर्दी, उपनगरांमध्ये भल्या पहाटे पावसाच्या सरी; पुढील तीन तास महत्वाचे, IMDचा अंदाज काय?
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Embed widget