एक्स्प्लोर

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान 41 वर्षांनी आमनेसामने. टीम इंडियाचा स्पर्धेत अजिंक्य प्रवास कायम, पाकिस्तानवर सलग दोन विजय.

 

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 चा अंतिम सामना (India vs Pakistan Asia Cup 2025 Final) आज (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ 41 वर्षांनी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने  या स्पर्धेत कोणत्याही संघाकडून एकही सामना गमावलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यावर खिळल्या आहेत. दोन्ही संघांमधील आशिया कप सामन्यादरम्यान मैदानावरील घडामोडी सुद्धा चर्चेत आहेत. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुकीच्या शैलीत बॅटने आनंद साजरा केला. हरिस रौफनेही चिथावणीखोर हावभाव केले. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीनंतर पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे बराच वाद रंगला असून तो अजूनही शमलेला नाही. 

 

भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही (Team India vs Pakistan rivalry)

आता, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने अंतिम सामन्यापूर्वी स्पष्ट केले आहे की तो त्याच्या खेळाडूंना भारताविरुद्ध त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही, परंतु कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची खात्री करावी. उत्साह दाखवणे महत्वाचे असल्याचे तो म्हणाला. सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सलमान आघा म्हणाला की, "प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर आपण आपल्या वेगवान गोलंदाजांना त्यांचा उत्साह दाखवण्यापासून रोखले तर काय उरते? मी कोणालाही थांबवणार नाही, फक्त एकच अट आहे की कोणताही अनादर होणार नाही."

हात मिळवण्याची परंपरा (coin toss handshake controversy) 

पाकिस्तानी कर्णधाराने जुन्या काळाची आठवण करून दिली की हस्तांदोलन ही क्रिकेटमध्ये चांगली परंपरा आहे. मागील सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा उल्लेख केला. सलमान म्हणाला, "मी 2007 मध्ये अंडर-16 स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून, मी कधीही दोन संघांना सामन्यानंतर हस्तांदोलन न करताना पाहिले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कितीही वाईट असले तरी आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले."

मागील पराभवातून धडे (Asia Cup 2025 final news) 

सलमान आगाने कबूल केले की त्यांच्या संघाने या स्पर्धेत भारताविरुद्ध पहिले दोन सामने त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे गमावले. ते म्हणाले की भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो. आम्ही शेवटचे दोन सामने गमावले कारण आम्ही भारतापेक्षा जास्त चुका केल्या. ही वस्तुस्थिती आहे.

आशिया कपमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव (IND vs PAK 2025 highlights)

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सात विकेट्सने जिंकला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सहा विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
AUS W vs ENG W: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
Vaibhav Sooryavanshi:वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला     
वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Embed widget