एक्स्प्लोर

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान 41 वर्षांनी आमनेसामने. टीम इंडियाचा स्पर्धेत अजिंक्य प्रवास कायम, पाकिस्तानवर सलग दोन विजय.

 

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 चा अंतिम सामना (India vs Pakistan Asia Cup 2025 Final) आज (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ 41 वर्षांनी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने  या स्पर्धेत कोणत्याही संघाकडून एकही सामना गमावलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यावर खिळल्या आहेत. दोन्ही संघांमधील आशिया कप सामन्यादरम्यान मैदानावरील घडामोडी सुद्धा चर्चेत आहेत. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुकीच्या शैलीत बॅटने आनंद साजरा केला. हरिस रौफनेही चिथावणीखोर हावभाव केले. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीनंतर पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे बराच वाद रंगला असून तो अजूनही शमलेला नाही. 

 

भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही (Team India vs Pakistan rivalry)

आता, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने अंतिम सामन्यापूर्वी स्पष्ट केले आहे की तो त्याच्या खेळाडूंना भारताविरुद्ध त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही, परंतु कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची खात्री करावी. उत्साह दाखवणे महत्वाचे असल्याचे तो म्हणाला. सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सलमान आघा म्हणाला की, "प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर आपण आपल्या वेगवान गोलंदाजांना त्यांचा उत्साह दाखवण्यापासून रोखले तर काय उरते? मी कोणालाही थांबवणार नाही, फक्त एकच अट आहे की कोणताही अनादर होणार नाही."

हात मिळवण्याची परंपरा (coin toss handshake controversy) 

पाकिस्तानी कर्णधाराने जुन्या काळाची आठवण करून दिली की हस्तांदोलन ही क्रिकेटमध्ये चांगली परंपरा आहे. मागील सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा उल्लेख केला. सलमान म्हणाला, "मी 2007 मध्ये अंडर-16 स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून, मी कधीही दोन संघांना सामन्यानंतर हस्तांदोलन न करताना पाहिले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कितीही वाईट असले तरी आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले."

मागील पराभवातून धडे (Asia Cup 2025 final news) 

सलमान आगाने कबूल केले की त्यांच्या संघाने या स्पर्धेत भारताविरुद्ध पहिले दोन सामने त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे गमावले. ते म्हणाले की भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो. आम्ही शेवटचे दोन सामने गमावले कारण आम्ही भारतापेक्षा जास्त चुका केल्या. ही वस्तुस्थिती आहे.

आशिया कपमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव (IND vs PAK 2025 highlights)

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सात विकेट्सने जिंकला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सहा विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Commonwealth Games 2026 : हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
Commonwealth Games 2026 : भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
Team India : विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 
विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget