एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी
![रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी India Vs Australia Ranchi Test Day 4 India Declared First Inning रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/19162042/Ranchi-Test.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी चौथ्या दिवसअखेर मोठ्या नाट्यमय वळणावर उभी आहे. या कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली आहे.
भारताच्या हाताशी अजूनही 129 धावांची आघाडी असून, या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे. भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं.
चेतेश्वर पुजाराचं द्विशतक, रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत नऊ बाद 603 या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती.
पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.
पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला मजबुती दिली. पुजारानं 525 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. त्याचं हे कसोटी कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठरलं.
रिद्धिमान साहानं 233 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्याचं हे तिसरं कसोटी शतक होतं. रवींद्र जाडेजानं 55 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.
रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिलं. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम खेळींच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यश आलं. मात्र, रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केल्यानंतर, DRS वापरल्यामुळे साहाला जीवदान मिळालं. पण यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पाहायला मिळाली.
संबंधित बातम्या :
भर मैदानात ग्लेन मॅक्सवेलने नक्कल करुन विराटला डिवचलं !
DRS मुळं रिद्धिमान साहाला जीवदान, ऑस्ट्रेलियन संघ नाराज
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)