एक्स्प्लोर

IND vs BAN, 1st T20 | बांगलादेशचा टीम इंडियावर 7 विकेट्सनी सनसनाटी विजय

सौम्या सरकारने 39 तर रहीमनं नाबाद 60 धावांची खेळी उभारली. या विजयामुळे बांगलादेशने तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

नवी दिल्ली : सौम्या सरकार आणि मुशफिकुर रहीमच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने दिल्लीच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियावर सात विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला. बांगलादेशचा टी ट्वेन्टीतला भारताविरुद्धचा हा आजवरचा पहिला विजय ठरला. या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशसमोर 149 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं 3 चेंडू आणि सात विकेट्स राखून हे आव्हान पार केलं. सौम्या सरकार आणि रहीमनं तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सौम्या सरकारने 39 तर रहीमनं नाबाद 60 धावांची खेळी उभारली. या विजयामुळे बांगलादेशने तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्याआधी बांगलादेशच्या अचूक माऱ्यासमोर टीम इंडियाला 20 षटकांत सहा बाद 148 धावांची मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवननं लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरच्या साथीनं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. धवनने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून शफिउल आणि अमिनुल इस्लामने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

रोहित शर्माचा भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याचा विक्रम

रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याचा विक्रम रचला. दिल्लीतील बांगलादेशविरुद्धचा टी ट्वेन्टी सामना हा रोहितच्या कारकीर्दीतला 99 वा सामना ठरला. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनीने आजवर 98 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर सुरेश रैना 78 आणि विराट कोहलीने 72 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज खेळवण्यात येत असलेल्या आजच्या सामन्याला एक खास महत्व आहे. कारण उभय संघातला हा सामना पुरुषांच्या ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक हजारावा सामना आहे. 17 फेब्रुवारी 2005 साली पुरुषांच्या टी ट्वेन्टी क्रिकेटमधला पहिला सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर गेल्या 14 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 999 सामने खेळवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget