एक्स्प्लोर

Team India : रोहितसेनेनं ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला, आता टीम इंडियानं 'या' चुका पुन्हा केल्यास महागात पडेल, कारण... 

Team India : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियानं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी इंग्लंडला पराभूत करावं लागणार आहे.

सेंट लूसिया : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या लढतीत पराभूत केलं आहे. भारतानं या विजयासह ऑस्ट्रेलियानं वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत केलेल्या पराभवाची परतफेड केली आहे. रोहित शर्मानं एकहाती किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रहार केला. विराट कोहली शुन्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं एकाबाजून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 205 धावा केल्या. मात्र, टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना रोहित शर्मानं ज्या गतीनं धावा केल्या तो वेग इतरांना कायम ठेवता आला नाही. त्यामुळं रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजानं खेळपट्टीवर तळ ठोकून थांबणं आवश्यक होतं. 

मिशेल मार्शला दोनदा जीवदान महागात

अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये डेव्हिड वॉर्नरची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं. यानंतर फलंदाजीला आलेल्या मिशेल मार्शला दोनदा जीवदान मिळालं. रिषभ पंत बॉलपर्यंत वेळेत पोहोचू न  शकल्यानं एकदा मिशेल मार्शला जीवदान मिळालं. यानंतर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर मिशेल मार्शला जीवदान मिळालं. मिशेल मार्शच्या मारलेला बॉल अर्शदीप सिंगच्या हातातून निसटला. यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मिशेल मार्श षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मिशेल मार्शनं 37 धावा केल्या. 

टीम इंडियाला रणनीती बदलणार की कायम ठेवणार?

इंग्लंड विरुद्ध भारताची मॅच गयाना येथे होणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत विराट कोहलीची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. विराट कोहलीला आतापर्यंत सलामीला बांगलादेश विरुद्धचा अपवाद वगळता दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं उपांत्य फेरीच्या  लढतीत रोहित शर्मा सलामीला विराट कोहली सोबत येणार की यशस्वी जयस्वालला संधी दिली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.    

रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. इंग्लंडनं भारताला 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 10 विकेटनं पराभूत केलं होतं. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यासह टीम इंडियाचे सर्व खेळाडू त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत भारतानं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच गमावली नाही. 

संबंधित बातम्या : 

टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध त्या चुका टाळाव्या लागणार, अन्यथा बसेल मोठा फटका 

IND vs ENG :...तर भारत इंग्लंड विरुद्ध एकही बॉल न खेळता थेट टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाणार, जाणून घ्या समीकरण

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 3rd T20 : चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget