T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धा 2 जूनपासून सुरू होत आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर ही स्पर्धा होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्डकपसाठी खेळाडूंनी अमेरिकेत सराव सुरु केला आहे. पण टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवू शकणार का, हा प्रश्न आहे. वास्तविक, भारतीय संघाने शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली होती, परंतु त्यानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. 10 वर्षांचा दुष्काळ भारतीय संघ कसा संपवणार?, याबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने (Brian Lara) प्रतिक्रिया दिली आहे.


...तर टीम इंडिया 10 वर्षे ICC ट्रॉफी जिंकू शकणार नाही-


ब्रायन लारा म्हणाला की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अनुभवी खेळाडूंनी भरलेला आहे यात शंका नाही, पण टी-२० विश्वचषकात त्याचा फायदा होईल का?, असा सवाल ब्रायन लारा यांनी उपस्थित केला. तसेच भारतीय संघात मोठी नावे असली तरी विश्वचषक जिंकण्यासाठी योग्य आणि अचूक रणनीती असणे अत्यंत गरजेचे आहे.,  असे झाल्यास भारतीय संघ विश्वचषक जिंकेल आणि 10 वर्षे आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात येईल. वनडे विश्वचषक असो की टी-20 विश्वचषक... टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतात, पण शेवटच्या क्षणी भारतीय संघ चूक करतो, असं ब्रायन लाराने सांगितले.


तुमच्या संघात किती सुपरस्टार, हे महत्वाचे नाही-


ब्रायन लारा पुढे म्हणाला की, तुमच्या संघात किती सुपरस्टार आहेत हे महत्त्वाचे नाही, तुम्ही विश्वचषक कसा जिंकणार आहात हे महत्त्वाचे आहे. तुमची रणनीती काय आहे... मला विश्वास आहे की भारतीय संघाचे प्रशिक्षक खेळाडूंना एकत्र आणण्यात यशस्वी होतील आणि टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल. नुकतेच भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ जवळपास 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे.


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान


टी-20 विश्वचषक 2024 चा फॉरमॅट असा असेल-


आगामी टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या