एक्स्प्लोर

Shubman Gill : इंग्लंड दौऱ्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार! कसोटी कर्णधार झाल्यानंतर शुभमन गिलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, रोहित भाई...

Shubman Gill First Statement as Test Captain : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Team India Test Captain Shubman Gill News : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. गिलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याच वेळी, आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे आणि त्याने त्याच्या संघाला आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये देखील नेले आहे. पण इंग्लंड दौऱ्यापूर्वीच नवीन कर्णधार शुभमन गिलने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्याच्या मदतीने तो ब्रिटिशांविरुद्ध जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. 

यावेळी, तरुण खेळाडूंनी भरलेला टीम इंडिया इंग्लंडच्या भूमीवर काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहे. यासाठी त्याने खास तयारी केली आहे. टीम इंडियाचे फलंदाज नेहमीच इंग्लंडविरुद्ध संघर्ष करतात, पण यावेळी गिलने यासाठी एक खास योजना तयार केली आहे. शुभमन गिलची कसोटी कर्णधार झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर कसोटी कर्णधार झाल्यानंतरची मुलाखत पोस्ट केली आहे.

गिलने बनवली खास रणनीती! 

कर्णधार शुभमन गिलने बीसीसीआयला दिलेल्या खास मुलाखतीत इंग्लंड दौऱ्याबद्दल काही मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला, "कर्णधार म्हणून माझ्यावर अधिक जबाबदारी असेल, पण मी खेळाडूंवर कोणताही दबाव आणणार नाही, त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्यास सांगेन. यामुळे त्यांना कोणत्याही दबावाशिवाय त्यांचे क्रिकेट खेळता येईल. याचा संघाला खूप फायदा होईल. यासोबत ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले बनवायचे आहे. यासाठी सर्व खेळाडूंशी मोकळेपणाने बोलेल".

कर्णधार असणे ही अभिमानाची गोष्ट...

टीम इंडियाचा नवा कर्णधार गिल म्हणाला, "भारतासाठी कसोटी संघाचे नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मी कधीही कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले नाही, परंतु मी टी-२० मध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, हा अनुभव त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. एक क्रिकेटपटू म्हणून, जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता तेव्हा तुमचे पहिले स्वप्न भारतासाठी खेळण्याचे असते. तसेच दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळत राहणे हे माझे स्वप्न आहे"

रोहित आणि विराटचे केले कौतुक

शुभमन पुढे म्हणाला, रोहित भाई आणि विराट भाई. दोघांचीही शैली वेगळी होती. पण दोन्ही दिग्गजांचे ध्येय एकच होते आणि त्यांना त्या दिशेने काम करताना पाहणे प्रेरणादायी होते. विराट भाई नेहमीच खूप आक्रमक असतो आणि त्याला आघाडीवरून नेतृत्व करायचे होते, तर रोहित भाई देखील आक्रमक होता पण त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्या हावभावातून ते दिसून येत नाही. रोहित भाई खूप शांत स्वभावाचे होते आणि नेहमीच हुशारीने काम करायचे. तो खेळाडूंशी खूप संवाद साधतो, खेळाडूंकडून त्याला काय हवे आहे ते त्यांना सांगतो आणि म्हणूनच मी त्याच्याकडून हे गुण शिकलो आहे.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Ladki Bahin Yojana EKYC : दररोज 4  ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
Embed widget