एक्स्प्लोर

Pakistan-Afghanistan War : अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील 3 उगवते तारे पाकड्यांच्या हल्ल्यात मारले गेले, राशिद खान संतापून म्हणाला, पाकिस्तान...

पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर बोर्डाने पुढील महिन्यात होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Afghanistan vs Pakistan War Three Cricketers Killed : पाकिस्तान हा असा देश आहे जो नेमहीच काहीतरी कुरापती काढत असतो. पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध ताणलेले आहेत. दरम्यान, आता हाच पाकिस्तान अफगाणिस्तान या देशाशी भिडला. सध्या या दोन्ही देशांत संघर्ष चालू आहे. पाकिस्तानने अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात उरगुन जिल्ह्यातील तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. 

अफगाणिस्तानच्या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू (Afghanistan vs Pakistan War Three Cricketers Killed)

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) शनिवारी पहाटे पुष्टी केली की, पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर बोर्डाने पुढील महिन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ACB ने याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर दिली. या हल्ल्यात प्राण गमावलेले क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून अशी त्यांची नावे आहेत. अफगाणिस्तान टी-20 संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू राशिद खान यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

राशिद खान काय म्हणाला?

अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यानेही आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं की,  अफगाणिस्तानवरील अलीकडील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांत निरपराध नागरिकांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. ही एक अशी शोकांतिका आहे, ज्यात महिलांसह, लहान मुलं आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. जेथे लोक वस्ती आहे, अश्या ठिकाणी हल्ले करणे ही अत्यंत अमानुष आणि अनैतिक कृत्य आहे. मी पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यांतून माघार घेण्याच्या ACB च्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करतो. या कठीण काळात मी माझ्या देशवासीयांसोबत उभा आहे, आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही.” 

तिरंगी टी-20 मालिकेमधून माघार (Afghanistan Boycotts Pakistan Tri-Series)

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत खेळाडूंना “अफगाण क्रिकेटचे भूमिगत हिरो” असे संबोधले. पक्तिका हल्ला आणि आपल्या देशातील खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार होती.

हे ही वाचा - 

ICC Women World Cup 2025 Points Table : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय! टीम इंडियाला भरली धडकी, पाकिस्तानमुळे टॉप-4 मधून होणार बाहेर? जाणून घ्या गणित

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget