एक्स्प्लोर

Ranji Trophy Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!

Ranji Cup 2024: मुंबईच्या धुरंधरांनी धडाकेबाज कामगिरी करत विदर्भावर मात केली आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : मुंबई : रणजी चषकाच्या (Ranji Cup 2024) अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवून, अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) मुंबई संघानं चषकावर नाव कोरलं. मुंबईनं (Mumbai) विदर्भाच्या (Vidarbha) संघाचा 169 धावांनी पराभूत करत 42 व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. मुंबईनं दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर ढेपाळला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरली. 

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरनं (Akshay Wadkar) झुंजार शतकी खेळी करुन डाव सावरला. त्याला हर्ष दुबेनं (Harsh Dubey) 65 धावा करुन भरभक्कम साथ दिली. उपहारापर्यंत 5 बाद  333 अशी भक्कम मजल विदर्भने मारली होती, पण उपहारानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी गिअर बदलून धडाधड विकेट काढल्या. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झालं. अक्षय वाडकरने झुंजार 102 तर हर्ष दुबेने 65 धावांची चिवट खेळी.

विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356

उपहारानंतर 5 बाद  333 वरुन विदर्भने खेळाला सुरुवात केली. मात्र तनुश कोटियनने अक्षय वाडकरला पायचित करुन मुंबईने विजयाच्या दिशेने कूच केली. यानंतर मग तुषार देशपांडेने हर्ष दुबे आणि आदित्य सरवटे यांना बाद करुन विदर्भला आणखी  धक्के दिले. त्यामुळे विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356 अशी झाली. यानंतर मग कोटियनने यश ठाकूरला तर धवल कुलकर्णीने उमेश यादवला बाद करुन विदर्भचा दुसरा डाव 368 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून तनुष कोटियने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि शतकवीर मुशीर खानला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.

42 व्यादां जेतेपदावर मुंबईचं नाव

दरम्यान, मुंबईने आजच्या विजयासह   42 व्या जेतेपदावर नाव कोरलं. 2015-16 नंतर मुंबईने मिळवलेला हा पहिला विजय आहे. 

वानखेडेवर फायनलचा थरार

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध विदर्भ असा फायनलचा थरार रंगला. रणजी करंडकाची फायनल चौथ्या दिवसअखेर यजमान मुंबईच्या बाजूनं झुकली होती. या सामन्यात विदर्भानं चौथ्या दिवसअखेर पाच बाद 248 धावांची मजल मारली होती. त्यामुळं विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 290 धावांचं कठीण आव्हान होतं. त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर होती. आज मुंबईने विदर्भचे 5 फलंदाज तंबूत धाडून विजय मिळवला.

या सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरनं झुंजार फलंदाजी केली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. करुण नायरनं 74 धावांची, तर अक्षय वाडकरनं नाबाद 102 धावांची खेळी उभारली.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Points Table Update : RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; लखनऊ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून मात
LSG vs DC Update : दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; लखनऊ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून मात
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाला 'सीमा' उरली नाही, पाकिस्तानातूनही शाबासकी, पाकचा माजी खेळाडू म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाला 'सीमा' उरली नाही, पाकिस्तानातूनही शाबासकी, पाकचा माजी खेळाडू म्हणाला...

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget