एक्स्प्लोर

Ranji Trophy Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!

Ranji Cup 2024: मुंबईच्या धुरंधरांनी धडाकेबाज कामगिरी करत विदर्भावर मात केली आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : मुंबई : रणजी चषकाच्या (Ranji Cup 2024) अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवून, अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) मुंबई संघानं चषकावर नाव कोरलं. मुंबईनं (Mumbai) विदर्भाच्या (Vidarbha) संघाचा 169 धावांनी पराभूत करत 42 व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. मुंबईनं दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर ढेपाळला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरली. 

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरनं (Akshay Wadkar) झुंजार शतकी खेळी करुन डाव सावरला. त्याला हर्ष दुबेनं (Harsh Dubey) 65 धावा करुन भरभक्कम साथ दिली. उपहारापर्यंत 5 बाद  333 अशी भक्कम मजल विदर्भने मारली होती, पण उपहारानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी गिअर बदलून धडाधड विकेट काढल्या. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झालं. अक्षय वाडकरने झुंजार 102 तर हर्ष दुबेने 65 धावांची चिवट खेळी.

विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356

उपहारानंतर 5 बाद  333 वरुन विदर्भने खेळाला सुरुवात केली. मात्र तनुश कोटियनने अक्षय वाडकरला पायचित करुन मुंबईने विजयाच्या दिशेने कूच केली. यानंतर मग तुषार देशपांडेने हर्ष दुबे आणि आदित्य सरवटे यांना बाद करुन विदर्भला आणखी  धक्के दिले. त्यामुळे विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356 अशी झाली. यानंतर मग कोटियनने यश ठाकूरला तर धवल कुलकर्णीने उमेश यादवला बाद करुन विदर्भचा दुसरा डाव 368 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून तनुष कोटियने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि शतकवीर मुशीर खानला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.

42 व्यादां जेतेपदावर मुंबईचं नाव

दरम्यान, मुंबईने आजच्या विजयासह   42 व्या जेतेपदावर नाव कोरलं. 2015-16 नंतर मुंबईने मिळवलेला हा पहिला विजय आहे. 

वानखेडेवर फायनलचा थरार

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध विदर्भ असा फायनलचा थरार रंगला. रणजी करंडकाची फायनल चौथ्या दिवसअखेर यजमान मुंबईच्या बाजूनं झुकली होती. या सामन्यात विदर्भानं चौथ्या दिवसअखेर पाच बाद 248 धावांची मजल मारली होती. त्यामुळं विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 290 धावांचं कठीण आव्हान होतं. त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर होती. आज मुंबईने विदर्भचे 5 फलंदाज तंबूत धाडून विजय मिळवला.

या सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरनं झुंजार फलंदाजी केली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. करुण नायरनं 74 धावांची, तर अक्षय वाडकरनं नाबाद 102 धावांची खेळी उभारली.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget