![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका'
T20 World Cup 2021 : विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. गरज भासल्यास हार्दिक दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
![IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका' Match Preview India vs Pakistan ICC Men's T20 World Cup 2021 16th Match Group 2 IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/15/ba803cd0be86db06b522eedf84ea571a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा करत विराट कोहली अन् कंपनीला धक्का दिलाय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. फिरकी गोलंदाज कुणाला घ्यायचं, हा प्रश्न कदाचीत विराटला सतावत असेल. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सुर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्या शोधणं कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. विराटच्या या वक्तव्यावरुन भारतीय संघ पाच गोलंदाज आणि सहा फलंदाज या सुत्राने मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेय. दोन फिरकी आणि तीन वेगवान अशा पाच गोलंदाजांसह भारत खेळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रविंद्र जाडेजा, बुमराह आणि शामीचं स्थान निश्चित मानलं जात आहे. जाडेजासोबत दुसरा फिरकीगोलंदाज कोण? अनुभवी अश्विन की वरुण चक्रवर्ती अन् राहुल चहर यांची वर्णी लागणार... एका जागेसाठी या तीन गोलंदाजामध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल. उर्वरित एका वेगवान स्थानासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांच्यात चूरस आहे. याशिवाय काम चलावू म्हणून कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा पर्याय उपलब्ध आहे.
पाकिस्तान संघाची फलंदाजीची भिस्त कर्णधार बाबर आझम, रिझवान आणि हाफीज यांच्यावर असेल. मागील दोन वर्षात बाबरने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान संघाला युएईमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी भारतीय फलंदाजांना सर्वाधिक धोकादायक ठरु शकतो. हॅरिस रौफ, हसन अली, शदाब खान आणि हाफीजही तुफान फॉर्ममध्ये आहेत.
भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम 12) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.
भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन, राहुल चहर, इशान किशन, शार्दूल ठाकूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)