एक्स्प्लोर

विराट पुन्हा कर्णधारपदी येताच अजिंक्य रहाणेची लक्षवेधी प्रतिक्रिया

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या, अजिंक्य रहाणे यांनं क्रीडारसिकांसमवेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचंही मन जिंकलं.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचं ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्त्वं करत अतिशय महत्त्वाच्या अशा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघाला विजयी मार्गावर नेणाऱ्या आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या, अजिंक्य रहाणे यांनं क्रीडारसिकांसमवेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचंही मन जिंकलं. त्याच्या संयमी नेतृत्त्वाची ठिकठिकाणी प्रशंसा झाली. पण, आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाची धुरा सुट्टीहून परतणाऱ्या विराट कोहलीच्याच हाती असणार आहे. त्यामुळं यावर अजिंक्यची काय प्रतिक्रिया असेल, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. याचं उत्तर खुद्द अजिंक्यनंच दिलं आहे.

'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना अजिंक्यनं निर्विवादपणे विराटच संघाचा कर्णधार असून आपण जेव्हा गरज असेल तेव्हा संघाचं नेतृत्त्वं करण्यासाठी आहोतच अशी लक्षवेधी आणि मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा संघाच्या उपकर्णधारपदाची जबबादारी असेल तर, इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा विराट कोहली भूषवेल. याचबाबत प्रतिक्रिया देत अजिंक्यनं त्याची बाजू स्पष्ट केली आहे.

Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम- शरद पवार

काय म्हणाला अजिंक्य?

'काहीही बदलेलं नाही. विराट यापुर्वी आणि यापुढंही कसोटी संघाचा कर्णधार असेल आणि मी उपकर्णधार. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्वं करणं हे माझं कामच होतं आणि संघाच्या विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करणं ही माझी जबाबदारी होती', असं अजिंक्य म्हणाला. इथं कर्णधारपद महत्त्वाचं नसून, त्या पदाला साजेशी कामगिरी तुम्ही नेमकी कशा प्रकारे बजावता हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत मी यशस्वी ठरलो, आशा करतो की यापुढंही हे चित्र असंच राहील. माझ्या संघासाठी अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा माझा मानस असेल, हे अजिंक्यनं स्पष्ट केलं.

विराटसोबतचं नातं नेमकं कसं?

विराट आणि माझं नातं नेहमीच चांगलं राहिलं आहे. आम्ही दोघांनीही एकत्र अशा अनेक स्मरणीय खेळी संघासाठी खेळल्या आहेत, असं म्हणत अजिंक्यनं विराटसोबचं नातं सर्वांपुढे ठेवलं.

कर्णधार म्हणून विराट कोहलीबाबत काय वाटतं?

विराटच्या कर्णधारपदामध्ये अनेक बारकावे असून, प्रत्येकासाठी त्याच्या परिभाषा वेगळ्या आहेत. अजिंक्यनंही विराट एका कर्णधाराच्या रुपात नेमका कसा आहे, या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'तो एक अतिशय तीक्ष्ण वृत्तीचा कर्णधार आहे. मैदानात तो प्रशंसनीय निर्णय घेतो. त्याला माझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत आणि मी आशा करतो की त्याचा अपेक्षाभंग कधीच होऊ देणार नाही', असं अजिंक्य म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 3rd T20 : चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Embed widget