एक्स्प्लोर

आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कोण आहे सर्वात यशस्वी कर्णधार?

Asia Cup :  आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप (Asia Cup).

Asia Cup :  आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप (Asia Cup). यंदाच्या आशिया कप (Asia Cup 2023) जेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे.  दरम्यान या भव्य क्रिकेट स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर भारत (Team India) हा असून भारताने तब्बल 7 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली भारताने चषक जिंकला आहे. 

पाच वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारताने चषक जिंकला असून यामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार मोहम्मह अझराउद्दीन आणि एमएस धोनी हे आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी दोन वेळा भारताला कप जिंकवून दिला आहे. याशिवाय सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रोहित शर्मा यांनीही एक-एकदा भारताला आशिया चषक मिळवून दिला आहे. तर नेमकी वर्षनिहाय यादी कशी आहे ते पाहूया...

वर्ष कर्णधार 
1984 सुनील गावस्कर
1988 दिलीप वेंगसरकर
1990/91 मोहम्मह अझराउद्दीन 
1995 मोहम्मह अझराउद्दीन 
2010 एमएस धोनी
2016 एमएस धोनी
2018 रोहित शर्मा

 

Asia Cup 2023 Final : आशिया चषाकाच्या जेतेपदासाठी भारत-श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने, पाहा आतापर्यंत कोण वरचढ

आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका  1988 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. या स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत सातवेळा आशिया चषकाची फायनल रंगली होती. यामध्ये भारताने चारवेळा बाजी मारली आहे. तर श्रीलंका संघाने तीन वेळा स्पर्धेवर नाव कोरलेय.  भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये  1991 दुसऱ्यांदा फायनल झाली होती, यामध्ये भारताने बाजी मारली. तिसऱ्यांदा 1995 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यामध्येही भारताने बाजी मारली होती. भारताने सलग तीन वेळा श्रीलंकेला हरवत आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर श्रीलंका संघाने पलटवार करत भारताला फायनलमध्ये सलग तीन वेळा जेतेपद पटकावले होते. 

श्रीलंकेचा पलटवार, भारताला तीन वेळा हरवले -

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवत हॅटट्रिक केली होती. त्यानंतर 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन फायनल जिंकून हॅट्ट्रिक नोंदवली होती. मात्र, यानंतर दोघांमध्ये शेवटची विजेतेपदाची लढत 2010 मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने विजय मिळवून आघाडी घेतली. आता २०२३ मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रविवारी होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  2023 मध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत दोघांमध्ये बरोबरी होणार की भारत आघाडी कायम ठेवणार?

1988- भारत
1991- भारत
1995- भारत
1997- श्रीलंका
2004- श्रीलंका
2008- श्रीलंका
2010- भारत.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs SRH IPL 2026 : हैदराबादचा IPL मधील सर्वात लाजिरवाणा पराभव! अहमदाबादमध्ये एकतर्फी सामना, गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये थेट नंबर-1
हैदराबादचा IPL मधील सर्वात लाजिरवाणा पराभव! अहमदाबादमध्ये एकतर्फी सामना, गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये थेट नंबर-1
GT vs SRH Live Score : गुजरात टायटन्सचा मोठा विजय; सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा
GT vs SRH Live Score Update IPL 2026 : गुजरात टायटन्सचा मोठा विजय; सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा
BCCI Dot Ball Green Initiative : IPL 2026 मध्ये डॉट बॉल पडला की झाड का दिसतं? BCCI च्या ‘त्या’ एका नियमामुळे देशात सुरू झाली हरित क्रांती
IPL 2026 मध्ये डॉट बॉल पडला की झाड का दिसतं? BCCI च्या ‘त्या’ एका नियमामुळे देशात सुरू झाली हरित क्रांती
IPL Most Runs First Over : सुरुवातीलाच विरोधकांचा गेम संपवला! IPL च्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 टीम्स
सुरुवातीलाच विरोधकांचा गेम संपवला! IPL च्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 टीम्स

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget