एक्स्प्लोर

Eng vs Ind 3rd Test : कृतीपेक्षा वाचाळ बडबडच जास्त, खेळापेक्षा वादावरच कर्णधार गिलचा भर! लॉर्ड्सवरील भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणे

लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताचा 22 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत मुसंडी मारली.

England vs India 3rd Test Update : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताचा 22 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत मुसंडी मारली. रवींद्र जडेजा शेवटपर्यंत एकाकी लढत राहिला. के. एल. राहुल, वॉशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत भागीदारी करत भारताचा डाव 71 वरून 170 पर्यंत नेला. मात्र, विजय मिळवता आला नाही. भारताच्या या पराभवामागे कोणते पाच मुख्य कारणं होती, पाहूया...

1. जैस्वालची निराशाजनक कामगिरी 

भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल या सामन्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात 8 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या. दुसऱ्या डावात तर तो खातेही न उघडता पुन्हा आर्चरकडून आऊट झाला. जैस्वालच्या लवकर बाद होण्यामुळे खालच्या फळीवर दडपण आलं.

2. करुण नायरचा नंबर 3 वर संघर्ष

नंबर तीनच्या जागेवर करुण नायर अजूनही स्थिरावलेला नाही. पहिल्या डावात 62 चेंडूंमध्ये 40 धावा करूनही तो मोठी खेळी करू शकला नाही. दुसऱ्या डावात केवळ 14 धावांवर बाद झाला. तीन कसोटीत त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही. ही भारतासाठी चिंतेची बाब ठरते.

3. वरच्या फळीतील अपयश

लॉर्ड्समधील पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या टॉप ऑर्डरने दिलेली दगाफटका. राहुल वगळता कोणताही फलंदाज ठसा उमटवू शकला नाही. जैस्वाल, करुणसह कर्णधार शुभमन गिलही फ्लॉप ठरला. गिलने पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात केवळ 6 धावा केल्या. कृतीपेक्षा वाचाळ बडबडच जास्त होती, खेळापेक्षा वादावरच कर्णधार गिलचा भर जास्त दिसला.

4. चौथ्या दिवशीच लिहिला पराभवाचा अध्याय

जरी सामना पाचव्या दिवशी संपला असला, तरी भारताचा पराभव चौथ्याच दिवशी निश्चित झाला होता. भारताने दुसऱ्या डावात केवळ 58 धावांत 4 गडी गमावले आणि सामना इंग्लंडच्या ताब्यात गेला. वरच्या फळीचा कोसळलेला डाव, खालच्या फळीवर आलेला दडपण आणि अपयशी बचाव या सर्व गोष्टी भारताला भारी पडल्या.

5. लंचपूर्वी गमावलेली विकेट्स, तीच चूक केली पुन्हा

तीनही कसोटीत भारताने लंचपूर्वी विकेट गमावण्याची एकच चूक वारंवार केली. यामुळे टीम इंडियाने स्वतःहूनच मोमेंटम इंग्लंडकडे ढकलला.

  • पहिल्या कसोटीत लंचपूर्वी के. एल. राहुल आणि साई सुदर्शन आऊट झाले.
  • एजबेस्टनमध्ये लंचपूर्वी करुण नायर, दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आऊट.
  • लॉर्ड्समध्ये तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत, तर दुसऱ्या डावात नीतीश रेड्डी लंचच्या शेवटच्या चेंडूवर आऊट.
एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Embed widget