एक्स्प्लोर

Ind Vs SL Asia Cup 2025: श्रीलंकेने भारताच्या तोंडाला फेस आणला, पण टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी मोठा फायदा, नेमकं काय घडलं?

Ind Vs SL Asia Cup 2025: भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी उत्कंठावर्धक सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना सूपर ओव्हरमध्ये गेला. श्रीलंकेने भारताला घाम फोडला.

Ind Vs SL Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेत शुक्रवारी भारत आणि श्रीलंका याच्यात रंगलेल्या सुपर-4 स्टेजच्या शेवटचा सामना कमालीचा थरारक झाला. या सामन्यात दोन्ही संघांचा स्कोअर सेम झाल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपरओव्हर (Super Over) खेळवावी लागली. यामध्ये भारतीय संघाला विजय मिळाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर (Ind Vs SL) विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. श्रीलंकेच्या  पथुमा निसांका (Pathum Nissanka) याने 58 चेंडूत 107 धावांची खेळी करत स्वत:च्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते. मात्र, शेवटच्या षटकात पथुमा निसांका बाद झाला आणि हा सामना श्रीलंकेच्या हातातून निसटला. भारताने हा अटीतटीचा सामना जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असली तरी या सामन्यात श्रीलंकेने भारताच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला होता. या सामन्यात भारतीय संघातील काही उणीवा समोर असल्या तरी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी (Ind Vs Pak Final) भारतीय संघाच्यादृष्टीने काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. 

Team India: भारतीय संघाची विजय लय कायम राहिली

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पथुमा निसांकाच्या वादळी खेळीमुळे एक वेळ अशी आली होती की, भारतीय संघ हा सामना हारणार असे वाटत होते. क्रिकेट समालोचक आणि स्क्रीनवर दाखवण्यात येणाऱ्या विश्लेषणानुसार, हा सामना पूर्पपणे श्रीलंकेच्या बाजूने झुकला होता. मात्र, भारतीय संघाने शांत राहत शेवटच्या षटकात हा सामना फिरवला होता. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नव्हता. श्रीलंकेविरुद्धचा सामना औपचारिकता असल्याने तो हरल्यास भारतीय संघाला काहीच फरक पडणार नव्हता. मात्र, हा सामना हरला असता तर टीम इंडियाची विजयी लय खंडित झाली असती. क्रिकेटमध्ये मोमेंटम हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही चांगली कामगिरी करुनही मोक्याच्या क्षणी मोमेंटम तुमच्या बाजूने नसले तर अनेक सामन्यांचे निकाल बदलताना दिसून आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धचा सामना हरली असती तर विजयी मोमेंटम ब्रेक झाले असते. याचा कुठेतरी टीम इंडियाच्या मनोबलावर परिणाम झाला असता.

Ind VS SRI Asia Cup Match: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंतचे जवळपास सर्व सामने सहजपणे जिंकले आहेत. थोडीफार अडचण वगळता भारतीय संघाचा या स्पर्धेत म्हणावा तसा कस लागला नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना एक रिअॅलिटी चेक मिळाला. आपल्याला गाफील राहून चालणार नाही, हे भारतीय संघाला उमगले. यापूर्वीच्या बहुतांश सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांच्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या पातळ्यांवरही संघाचा कस लागला आणि भारताने विजयही मिळवला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यापूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली, असे म्हणता येईल.

Asia Cup Team India: भारतीय संघाच्या मधल्या फळीची आश्वासक कामगिरी

यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारतीय फलंदाजी म्हणजे अभिषेक शर्मा असेच समीकरण होऊन गेले होते. भारताचे सलामीचे फलंदाज वगळता मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी आश्वासक नव्हती. एकट्या अभिषेक शर्मावर अवलंबून राहिल्यामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला धोका होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी भारतीय संघाचा डाव सावरला. संजू सॅमसन याने 39 धावा केल्या. तर तिलक वर्माने नाबाद 49 धावा केल्या. या दोघांनी भारतीय संघाची धावगती सातत्याने 10-11च्या आसपास राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा ओलांडू शकला. त्यामुळे फायनलमध्ये भारतीय संघ हा पूर्णपणे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर विसंबून नसेल, ही बाब आश्वासक म्हणावी लागेल.

Jaspirt Bumrha: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी महत्त्वाच्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती

श्रीलंकेविरुद्धचा सामना फारसा महत्त्वाचा नसल्याने टीम इंडियाने या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली होती. तर हार्दिक पांड्याही केवळ एक षटक टाकून पॅव्हेलिनयमध्ये माघारी परतला होता. त्याचे स्नायू दुखावल्याची माहिती समोर आली होती. ही दुखापत वाढली असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट नसता. त्यामुळे टीम इंडियाने कोणताही धोका न पत्कारता हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी फारकाळ मैदानात राहून दिले नाही. परिणामी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी बुमराह आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही खेळाडू ताजेतवाने असतील.

Team India VS Srilanka: दबावाच्या परिस्थितीतही टीम इंडियाने सामना फिरवला

आशिया कप स्पर्धेत शुक्रवारी पहिल्यांदाच श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा कस लागला. श्रीलंकेच्या पथुमा निसांका याच्यासमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. एकावेळेला हा सामना भारत हरेल, असे वाटत होते. भारतीय गोलंदाज प्रचंड दबावाखाली होते. मात्र, यावेळी भारतीय संघाने एखाद्या कसलेल्या व्यावसायिक संघाप्रमाणे खेळ करत योग्य संधी येण्याची वाट पाहिली आणि हा सामना फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा मानसिक दबावाखाली असताना भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावतात, हे दिसून आले. अंतिम फेरीचा सामन्यात संघांवर निश्चितच मोठे दडपण असते. अशा परिस्थितीत सायकॉलॉजिकल प्रेशर हा घटक महत्त्वाचा ठरतो. श्रीलंकेमुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यापूर्वी अशी परिस्थिती अनुभवली आणि त्यामधून मार्ग काढला. अंतिम सामन्यात ही गोष्ट भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे.

आणखी वाचा

भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget