एक्स्प्लोर

Ind Vs SL Asia Cup 2025: श्रीलंकेने भारताच्या तोंडाला फेस आणला, पण टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी मोठा फायदा, नेमकं काय घडलं?

Ind Vs SL Asia Cup 2025: भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी उत्कंठावर्धक सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना सूपर ओव्हरमध्ये गेला. श्रीलंकेने भारताला घाम फोडला.

Ind Vs SL Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेत शुक्रवारी भारत आणि श्रीलंका याच्यात रंगलेल्या सुपर-4 स्टेजच्या शेवटचा सामना कमालीचा थरारक झाला. या सामन्यात दोन्ही संघांचा स्कोअर सेम झाल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपरओव्हर (Super Over) खेळवावी लागली. यामध्ये भारतीय संघाला विजय मिळाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर (Ind Vs SL) विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. श्रीलंकेच्या  पथुमा निसांका (Pathum Nissanka) याने 58 चेंडूत 107 धावांची खेळी करत स्वत:च्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते. मात्र, शेवटच्या षटकात पथुमा निसांका बाद झाला आणि हा सामना श्रीलंकेच्या हातातून निसटला. भारताने हा अटीतटीचा सामना जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असली तरी या सामन्यात श्रीलंकेने भारताच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला होता. या सामन्यात भारतीय संघातील काही उणीवा समोर असल्या तरी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी (Ind Vs Pak Final) भारतीय संघाच्यादृष्टीने काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. 

Team India: भारतीय संघाची विजय लय कायम राहिली

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पथुमा निसांकाच्या वादळी खेळीमुळे एक वेळ अशी आली होती की, भारतीय संघ हा सामना हारणार असे वाटत होते. क्रिकेट समालोचक आणि स्क्रीनवर दाखवण्यात येणाऱ्या विश्लेषणानुसार, हा सामना पूर्पपणे श्रीलंकेच्या बाजूने झुकला होता. मात्र, भारतीय संघाने शांत राहत शेवटच्या षटकात हा सामना फिरवला होता. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नव्हता. श्रीलंकेविरुद्धचा सामना औपचारिकता असल्याने तो हरल्यास भारतीय संघाला काहीच फरक पडणार नव्हता. मात्र, हा सामना हरला असता तर टीम इंडियाची विजयी लय खंडित झाली असती. क्रिकेटमध्ये मोमेंटम हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही चांगली कामगिरी करुनही मोक्याच्या क्षणी मोमेंटम तुमच्या बाजूने नसले तर अनेक सामन्यांचे निकाल बदलताना दिसून आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धचा सामना हरली असती तर विजयी मोमेंटम ब्रेक झाले असते. याचा कुठेतरी टीम इंडियाच्या मनोबलावर परिणाम झाला असता.

Ind VS SRI Asia Cup Match: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंतचे जवळपास सर्व सामने सहजपणे जिंकले आहेत. थोडीफार अडचण वगळता भारतीय संघाचा या स्पर्धेत म्हणावा तसा कस लागला नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना एक रिअॅलिटी चेक मिळाला. आपल्याला गाफील राहून चालणार नाही, हे भारतीय संघाला उमगले. यापूर्वीच्या बहुतांश सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांच्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या पातळ्यांवरही संघाचा कस लागला आणि भारताने विजयही मिळवला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यापूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली, असे म्हणता येईल.

Asia Cup Team India: भारतीय संघाच्या मधल्या फळीची आश्वासक कामगिरी

यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारतीय फलंदाजी म्हणजे अभिषेक शर्मा असेच समीकरण होऊन गेले होते. भारताचे सलामीचे फलंदाज वगळता मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी आश्वासक नव्हती. एकट्या अभिषेक शर्मावर अवलंबून राहिल्यामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला धोका होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी भारतीय संघाचा डाव सावरला. संजू सॅमसन याने 39 धावा केल्या. तर तिलक वर्माने नाबाद 49 धावा केल्या. या दोघांनी भारतीय संघाची धावगती सातत्याने 10-11च्या आसपास राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा ओलांडू शकला. त्यामुळे फायनलमध्ये भारतीय संघ हा पूर्णपणे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर विसंबून नसेल, ही बाब आश्वासक म्हणावी लागेल.

Jaspirt Bumrha: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी महत्त्वाच्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती

श्रीलंकेविरुद्धचा सामना फारसा महत्त्वाचा नसल्याने टीम इंडियाने या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली होती. तर हार्दिक पांड्याही केवळ एक षटक टाकून पॅव्हेलिनयमध्ये माघारी परतला होता. त्याचे स्नायू दुखावल्याची माहिती समोर आली होती. ही दुखापत वाढली असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट नसता. त्यामुळे टीम इंडियाने कोणताही धोका न पत्कारता हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी फारकाळ मैदानात राहून दिले नाही. परिणामी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी बुमराह आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही खेळाडू ताजेतवाने असतील.

Team India VS Srilanka: दबावाच्या परिस्थितीतही टीम इंडियाने सामना फिरवला

आशिया कप स्पर्धेत शुक्रवारी पहिल्यांदाच श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा कस लागला. श्रीलंकेच्या पथुमा निसांका याच्यासमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. एकावेळेला हा सामना भारत हरेल, असे वाटत होते. भारतीय गोलंदाज प्रचंड दबावाखाली होते. मात्र, यावेळी भारतीय संघाने एखाद्या कसलेल्या व्यावसायिक संघाप्रमाणे खेळ करत योग्य संधी येण्याची वाट पाहिली आणि हा सामना फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा मानसिक दबावाखाली असताना भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावतात, हे दिसून आले. अंतिम फेरीचा सामन्यात संघांवर निश्चितच मोठे दडपण असते. अशा परिस्थितीत सायकॉलॉजिकल प्रेशर हा घटक महत्त्वाचा ठरतो. श्रीलंकेमुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यापूर्वी अशी परिस्थिती अनुभवली आणि त्यामधून मार्ग काढला. अंतिम सामन्यात ही गोष्ट भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे.

आणखी वाचा

भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Team India : गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget