एक्स्प्लोर

IND vs SCOT : भारताला 'विराट' विजयाची गरज, आज स्कॉटलँडसोबत सामना

IND vs SCOT, T20 world Cup 2021: टी20 विश्वचषकात आज भारतीय संघाचा सामना नवख्या स्कॉटलँड संघासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे.

IND vs SCOT, T20 world Cup 2021: टी20 विश्वचषकात आज भारतीय संघाचा सामना नवख्या स्कॉटलँड संघासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे. त्यासोबतच अफगाणिस्तान-न्यूझीलंड या सामन्यावरही भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट अवलंबून आहे. भारत आणि स्कॉटलँड यांच्यात दुबईच्या मैदानावर सायंकाळी सामना होणार आहे. दुबईच्या मैदानावरील मागील दोन्ही सामने भारताने गमावलेले आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघानं भारताचा पराभव केला होता.  

भारत आणि स्कॉटलँड विश्वचषकातील आपला चौथा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. याआधी झालेल्या तीन सामन्यापैकी भारतीय संघाला दोन सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तर स्कॉटलँड संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. स्कॉटलँड संघ गुणतालिकेत तळाशी असून उपांत्य फेरीच्या शर्यातीतूनही बाहेर गेला आहे. भारत स्कॉटलँड संघासोबत पहिल्यांदाच टी20 सामना खेळणार आहे. अफगाणिस्तानविरोधातील विजयी भारतीय संघ कायम राहण्याची शक्यता आहे.  

अफगाणिस्तानवर 66 धावांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर विराट सेनेच्या नजरा ही गती कायम ठेवण्यावर असेल. स्कॉटलँ विरोधातील सामन्यात भारताला केवळ विजयाची नोंद करावी लागणार नाही तर नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि इतर संघांचे निकाल अनुकूल असतील अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे भारताचा रन रेट खूप घसरला होता. आता भारतासाठी प्रत्येक सामना करा किंवा मरा असा आहे. पाकिस्तानने सलग चार विजयांसह उपांत्य फेरी गाठली असून न्यूझीलंडही गट 2 मधून पात्र होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तसे, न्यूझीलंड नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून हरले तर भारताच्या आशा पल्लवित होऊ शकतात. मात्र, भारतीय संघ आपल्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि संघाच्या नजरा स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्यावर आहेत.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरलेल्या भारताच्या दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर रोहित शर्माला पुन्हा सलामीला पाठवण्यात आले. त्यानेही शानदार अर्धशतक झळकावून आपला फॉर्म दाखवला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही निर्णय चुकीचे ठरल्याचे रोहितने सामन्यानंतर मान्य केले. रोहित, केएल राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगल्या धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवच्या आगमनाने फलंदाजी मजबूत झाली आहे. त्याच्याशिवाय खालच्या फळीत रवींद्र जडेजाही उपयुक्त ठरतो. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
GT vs RR Match Fixing Allegation : राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं?
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Indians IPL News : रोहित शर्माकडे कॅप्टन निवडीची जबाबदारी; सूर्यकुमार, जसप्रीत नव्हे... मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी पहिलं नाव आलं समोर
रोहित शर्माकडे कॅप्टन निवडीची जबाबदारी; सूर्यकुमार, जसप्रीत नव्हे... मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी पहिलं नाव आलं समोर

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Tukaram Mundhe : धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
Karnataka Politics: कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
US Iran War Impact: वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
अमेरिका इराण युद्धामुळं वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
Embed widget