एक्स्प्लोर

Ind vs Nz Rain Update : बंगळुरूमध्ये यलो अलर्ट, रोहित शर्मा टेन्शनमध्ये; WTC फायनलचं गणित फिस्कटणार?

India Vs New Zealand 1st Test bengaluru Rain Weather Report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे.

Team India WTC Final Scenario : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. जी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​सायकलचा भाग आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, मात्र हा सामना पावसाच्या छायेत असून पहिल्याच दिवशी पावसामुळे नाणेफेक झाली नसल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर यानंतर उर्वरित चार दिवसही पाऊस पडणार असल्याची चर्चा असल्याने भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. 

भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करण्याचा आणि पीसीटी आणखी पुढे नेण्याचा भारताचा प्रयत्न असेल, जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही सामने गमावले तरी त्याचा अंतिम सामना खेळण्यावर फारसा परिणाम होणार नाही. पण रोहित शर्मा आणि भारताच्या या पाऊस आशा धुळीला मिळू शकतात.  

भारतीय संघाच्या पीसीटीवर होणार परिणाम 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलवर नजर टाकली तर, भारतीय संघ सध्या 74.240 वर आहे. पण बंगळुरूचा सामना पावसामुळे रद्द झाला तर? अशा स्थितीत सामना अनिर्णित राहील आणि टीम इंडियाचा पीसीटी जो सध्या 74.240 आहे तो 70.83 इतका कमी होईल. म्हणजे भारताचे मोठे नुकसान होईल. जर आपण न्यूझीलंडबद्दल बोललो, तर हा संघ सध्या 37.500 च्या पीसीटी सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. जर बेंगळुरू टेस्ट रद्द झाली तर त्याचे पीसीटी 37.04 पर्यंत कमी होईल. म्हणजे पीसीटीनुसार न्यूझीलंडला फारसे नुकसान होणार नाही.

दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी बेंगळुरूच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी येथे 70 ते 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातही पाऊस आहे. येथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच पाऊस कमी असो वा जास्त असो, सामन्यादरम्यान व्यत्यय येणारच. भारतीय चाहत्यांना आशा असेल की हा सामना होईल आणि टीम इंडिया जिंकण्यात यशस्वी होईल, जेणेकरून ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या जवळ आणखी एक पाऊल टाकू शकेल.

WTC फायनल कधी होणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या तिसऱ्या सत्राचा अंतिम सामना पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये 11 ते 15 जून या कालावधीत लॉर्ड्स येथे खेळवला जाईल. आयसीसीने या सामन्यासाठी 16 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. लॉर्ड्स प्रथमच WTC फायनलचे आयोजन करणार आहे. कोणते दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg ODI Series: रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
IND vs AFG Test Series: पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Sairaj Bahutule Team India New Spin Coach: टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
Embed widget