एक्स्प्लोर

IND vs AUS 1st ODI: वानखेडेवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया भिडणार; कोण ठरणार सरस?

IND vs AUS: वानखेडेवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

Wankhede Stadium Stats: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी झालेली टी-20 मालिका टीम इंडियाने खिशात घातली असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही (Border Gavaskar Trophy) टीम इंडियाने जिंकली आहे. त्यामुळे आता वनडे सामन्यांची मालिका (IND vs AUS 1st ODI) टीम इंडिया जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वानखेडेवर (Wankhede Stadium) कांगारुंचा पराभव करणं टीम इंडियासाठी सोपं नसणार आहे. मागे वळून पाहिलं तर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरोधात यापूर्वी चार वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने (Team Australia) तीन वेळा बाजी मारली आहे. 

वानखेडेवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ फेब्रुवारी 1996 मध्ये पहिल्यांदा भिडले होते. या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव केला होता. यानंतर नोव्हेंबर 2003 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात कांगारु संघाने टीम इंडियाचा 77 धावांनी पराभव केला. ऑक्टोबर 2007 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडेवर विजय मिळवू शकला. त्यानंतर टीम इंडियाने हा सामना 2 विकेट्सनी जिंकला. यानंतर अखेरच्या सामन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव केला होता.

वानखेडेमध्ये टीम इंडियाचा विक्रम

वानखेडेच्या मैदानावर टीम इंडियाचा एकूण रेकॉर्डही सरासरी राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघ या मैदानावर एकूण 19 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये 10 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत आणि 9 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. म्हणजेच, या मैदानावर भारताची विजयाची टक्केवारी 52.63 इतकी आहे.

पहिल्या वनडेची मदार पांड्याच्या खांद्यावर 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थित राहणार आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो या सामन्याचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या टीम इंडियाची मदार सांभाळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करण्याची हार्दिकची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्याने T20 मध्ये कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने 11 पैकी 8 टी-20 मध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WTC Final : ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, कशी आहे WTC गुणतालिका? वाचा सविस्तर 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget