Ind vs Pak Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर पाकिस्तानने खाजवून कळ काढलीच, लाहोरमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्यास नकार नेमकं काय घडलं?, Video Viral
Ind vs Pak Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील.

Champions Trophy 2025 Indian flag not placed in Karachi stadium : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर पाकिस्तान खाजवून कळ काढत आहे. खरंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते दावा करत आहेत की, कराची स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकवण्यात आला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, जर कोणताही देश बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करत असेल तर त्याला सर्व सहभागी देशांचे झेंडे फडकावावे लागतात. पण, कराचीमध्ये या आठ देशांच्या स्पर्धेतील सात देशांचे झेंडे फडकलेले दिसतात.
यामुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे आणि पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. यामुळे सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. पण, एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. भारतीय ध्वज नसण्यामागील खरे कारण आणून तरी समोर आले नाही. कराची स्टेडियममध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांचे सामने होतील. स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ समोर आला. इतर सात सहभागी देशांचे ध्वज दिसत आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश देखील या मैदानावर कोणतेही सामने खेळणार नाहीत, परंतु त्यांचे झेंडे देखील तेथे फडकवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) असे कृत्य का केले याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations. pic.twitter.com/rjM9LcWQXs
— Arsalan (@Arslan1245) February 16, 2025
सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यामुळे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीला स्पर्धा हायब्रिड मोडमध्ये रूपांतरित करावी लागली. या मॉडेलनुसार जर भारत बाद फेरीसाठी पात्र ठरला, तर त्याला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह सर्व सामने दुबईमध्ये खेळावे लागतील. बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यातील करारानुसार पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या काही वर्षांत भारताने आयोजित केलेल्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारतात आपले सामने खेळणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघ :
मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
हे ही वाचा -




















