Gautam Gambhir News : मँचेस्टर कसोटी अनिर्णित, गौतम गंभीरसह 3 जणांवर टांगती तलवार, BCCI घेणार मोठा निर्णय, अहवालात खुलासा
BCCI likely to chop Morne Morkel after Asia Cup : भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर बरेच काही बदलू शकते. गौतम गंभीरसह 3 जणांवर बीसीसीआय मोठा निर्णय घेणार असल्याचा अहवाल आहे.

England vs India 5th Test Update : मँचेस्टर कसोटीचा निकाल अनिर्णित राहिला. म्हणजेच 5 कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-2 अशी आहे. पण, दरम्यान एक मोठा अहवाल येत आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की बीसीसीआय लवकरच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह 3 जणांवर मोठा निर्णय घेऊ शकते आणि टीम इंडियातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अहवालानुसार, बीसीसीआयची ही कारवाई इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.
बीसीसीआय गौतम गंभीरसह 3 जणांवर घेणार मोठा निर्णय
अहवालानुसार, बीसीसीआय इंग्लंड दौऱ्यावर कोणतीही कारवाई करताना दिसणार नाही. परंतु, आशिया कप 2025 नंतर आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, ते मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह 3 जणांवर मोठे निर्णय घेऊ शकते. येथे 3 जणांचा अर्थ गौतम गंभीर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन डेस्केट असा आहे.
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांना काढून टाकणार?
मोर्ने मॉर्केलच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाच्या गोलंदाजीत फारशी सुधारणा झालेली नाही. क्षेत्ररक्षणात रायन डेस्कोटोच्या बाबतीतही असेच आहे. अशा परिस्थितीत, या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. गौतम गंभीरच्या आग्रहावरूनच मोर्ने मॉर्केल आणि रायन डेस्कोटो यांची टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एन्ट्री झाली होती. बीसीसीआय गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवू शकते.
मुंबईच्या अभिषेक नायर यांनाही त्यांनी सहायक प्रशिक्षक म्हणून घेतले होते. गंभीरने लखनऊ सुपर जायंट्ससह मॉर्केलसोबत तर कोलकाता नाइट रायडर्समध्ये नायर आणि टेन डोएशेटेसोबत आधी काम केलं होतं. मात्र, 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर अभिषेक नायर यांना सपोर्ट स्टाफमधून काढून टाकण्यात आलं.
The 4th Test ends in a draw in Manchester! 🤝
— BCCI (@BCCI) July 27, 2025
Tremendous display of resistance and composure from #TeamIndia in Manchester! 👏👏
Onto the Final Test at the Oval 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/GCpaWQKVfb
ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीपूर्वी या प्रशिक्षक टीमच्या मार्गदर्शनाखाली भारताने 13 कसोटींपैकी केवळ 4 सामने जिंकले होते. या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, इंग्लंडमध्ये संघासोबत असलेले निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि ईस्ट झोनचे प्रतिनिधी शिव सुंदर दास हे दोघेही बीसीसीआयच्या रडारवर आहेत.
मँचेस्टर कसोटी सामन्यात काय घडलं?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकांमुळे भारताने मँचेस्टरमध्ये खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला. पहिल्या डावात भारताच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 669 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात 311 धावांनी पिछाडीवर असतानाही, भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी दाखवली आणि 143 षटकांत चार गडी बाद 425 धावा केल्या. कर्णधार गिलच्या नेतृत्वाखाली संघाने एकही धाव न घेता दोन गडी गमावूनही शानदार फलंदाजी केली. 103 धावा करण्याव्यतिरिक्त, गिलने लोकेश राहुल (90) सोबत 188 धावांची भागीदारी करून भारताला सामन्यात परत आणले, त्यानंतर जडेजा (107 नाबाद) आणि सुंदर (101 नाबाद) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना यशापासून दूर ठेवले.
हे ही वाचा -





















