एक्स्प्लोर

IND vs AUS:  ऑस्ट्रेलियाला भारतात जिंकायचीय कसोटी मालिका, कर्णधार पॅट कमिन्स बनतोय खास प्लॅन

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये (India vs Australia) दमदार प्रदर्शन करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या गुणतालिकेत ऑस्ट्रिलियाचा संघ अव्वल स्थानी आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये (India vs Australia) दमदार प्रदर्शन करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या गुणतालिकेत ऑस्ट्रिलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. डब्लूटीसीच्या दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 6 सामन्यात विजय मिळवला आहे. एवढेच नव्हे तर, आयसीसी कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 विकेट्सनं जिंकल्यानंतर ऑस्ट्रिलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं (Pat Cummins) भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  "कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारतात जाऊन कसोटी मालिका जिंकावी लागेल", असं त्यानं म्हटलंय.

पॅट कमिन्स काय म्हणाला?
श्रीलंकाविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत कमिन्स म्हणाला की, "ऑस्ट्रेलियाच्या संघाला पुढच्या वर्षी भारतात कसोटी मालिका खेळायची आहे. तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल आणि आम्ही ते केले. जगातील नंबर वन कसोटी संघ बनायचं असेल तर परदेशात जाऊन जिंकणं गरजेचं आहे. आमच्याकडे मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी आहेत, ज्यांना या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव नाही. पहिल्या सामन्यात आमचा दृष्टिकोन खूप चांगला होता. सर्व फलंदाजांचाकडं एक वेगळा प्लॅन होता. प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी असली, तरी गोलंदाजांवर दबाव निर्माण करणं हा त्यांचा उद्देश होता. हा अनुभव आगामी मालिकेत कामी येईल", असंही पॅट कमिन्सनं म्हटलंय.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढच्या वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान, डब्लूटीसी 2021-23 च्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका अतिशय महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियानं 2004 साली भारतीय भूमीवर शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
Embed widget