एक्स्प्लोर

IND Vs AUS 4th T20 Highlights : टीम इंडियाने बदला घेतला; ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकत जागतिक पराक्रमही केला नावावर!

टीम इंडियाने वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला. मायदेशातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिका 3-1 ने जिंकली आहे.

IND Vs AUS 4th T20 Highlights : टीम इंडियाने वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला. मायदेशातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. यासह जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 विजय मिळवण्याचा पराक्रम करत पाकिस्तानला मागे टाकले आहे. टीम इंडियाने रायपूर टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला. रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीत आपली ताकद दाखवली. अक्षर पटेलच्या फिरकीने गोलंदाजीने धमाका करत तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाने आता या T20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

रिंकू आणि जितेशची दमदार खेळी

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीला दिले. येथे भारतीय सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावा जोडल्या. या एकूण धावसंख्येवर यशस्वी (37) बाद झाला आणि त्यानंतर टीम इंडियाने श्रेयस अय्यर (8) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (1) यांची झटपट विकेटही गमावली. टीम इंडियाने 63 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. येथून रिंकू सिंहसह ऋतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. गायकवाडही ३२ धावा करून बाद झाला तेव्हा रिंकू आणि जितेश शर्मा यांनी डाव पुढे नेला. दोघांनी 32 चेंडूत 56 धावांची जलद भागीदारी केली.

रिंकू आणि जितेश जेव्हा क्रीझवर होते तेव्हा टीम इंडिया आज पुन्हा एकदा 200 पार करेल असं वाटत होतं. पण इथे जितेश 19 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. ही भागीदारी तुटल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून तुफान खेळी झाली आणि शेवटच्या ५ विकेट अवघ्या 7 धावांत पडल्या. अक्षर पटेल (0), रिंकू सिंग (46), दीपक चहर (0) आणि रवी बिश्नोई (1) पॅव्हेलियनमध्ये परतले. अशाप्रकारे भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 174 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशियसने 4 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले. बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघालाही २-२ बळी मिळाले. अॅरॉन हार्डीनेही एक विकेट घेतली.

टी-20 मालिका जिंकत जागतिक पराक्रमही केला नावावर!

दुसरीकडे, पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 136 वा विजय देखील मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget