एक्स्प्लोर

IND Vs AUS 4th T20 Highlights : टीम इंडियाने बदला घेतला; ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकत जागतिक पराक्रमही केला नावावर!

टीम इंडियाने वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला. मायदेशातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिका 3-1 ने जिंकली आहे.

IND Vs AUS 4th T20 Highlights : टीम इंडियाने वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला. मायदेशातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. यासह जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 विजय मिळवण्याचा पराक्रम करत पाकिस्तानला मागे टाकले आहे. टीम इंडियाने रायपूर टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला. रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीत आपली ताकद दाखवली. अक्षर पटेलच्या फिरकीने गोलंदाजीने धमाका करत तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाने आता या T20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

रिंकू आणि जितेशची दमदार खेळी

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीला दिले. येथे भारतीय सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावा जोडल्या. या एकूण धावसंख्येवर यशस्वी (37) बाद झाला आणि त्यानंतर टीम इंडियाने श्रेयस अय्यर (8) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (1) यांची झटपट विकेटही गमावली. टीम इंडियाने 63 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. येथून रिंकू सिंहसह ऋतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. गायकवाडही ३२ धावा करून बाद झाला तेव्हा रिंकू आणि जितेश शर्मा यांनी डाव पुढे नेला. दोघांनी 32 चेंडूत 56 धावांची जलद भागीदारी केली.

रिंकू आणि जितेश जेव्हा क्रीझवर होते तेव्हा टीम इंडिया आज पुन्हा एकदा 200 पार करेल असं वाटत होतं. पण इथे जितेश 19 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. ही भागीदारी तुटल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून तुफान खेळी झाली आणि शेवटच्या ५ विकेट अवघ्या 7 धावांत पडल्या. अक्षर पटेल (0), रिंकू सिंग (46), दीपक चहर (0) आणि रवी बिश्नोई (1) पॅव्हेलियनमध्ये परतले. अशाप्रकारे भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 174 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशियसने 4 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले. बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघालाही २-२ बळी मिळाले. अॅरॉन हार्डीनेही एक विकेट घेतली.

टी-20 मालिका जिंकत जागतिक पराक्रमही केला नावावर!

दुसरीकडे, पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 136 वा विजय देखील मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget