Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 14 Jun 2016 05:40 PM (IST)
1/5
'आमच्याकडे अनुभवी खेळाडू होते. जे क्रिकेट चांगलं खेळू शकतात. तरीही आम्हाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.' असं म्हणत मखायानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
2/5
या पराभवानं मखाया खूपच व्यथित झाला होता. 'जर मैदानाबाहेर टॉमेटोचं झाडं असतं तरी मी स्वत:ला फाशी लावून घेतली असती.' असं वक्त्यव्य मयाखानं केलं. AFP PHOTO
3/5
भारत झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाण्याआधी मखाया म्हणाला होता की, 'अनेकदा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी प्रत्येक संघ आपली ब दर्जाची टीम पाठवतो. पण येत्या काही काळामध्ये त्यांना आपल्या प्रमुख संघाला पाठवावं लागेल.' पण मालिका पराभवानंतर एन्टनीनं एक धक्कादायक वक्तव्य केलं.
4/5
काल टीम इंडियासमोर अवघ्या 127 धावांचं आव्हान होतं. भारतानं हे आव्हान सहजरित्या पार करीत मालिका आपल्या नावावर केली. पण झिम्बाब्वेच्या या पराभवानंतर टीमचा कोच मखाया एन्टनीनं केलेलं वक्तव्यांनी एकच खळबळ माजली.
5/5
दुसऱ्या वनडे सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 8 गडी राखून मात केली आणि मालिकाही खिशात टाकली. दीड वर्षानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मालिका विजय मिळवला.