एक्स्प्लोर
किसान मार्च मुंबईकडे रवाना, खोळंब्यामुळे बारावीचे विद्यार्थी अडकले

1/7

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांसह नगर, मालेगावमधून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांसह, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.
2/7

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाईचा प्रयत्न केल्यानंतरही किसान सभेचे नेते आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
3/7

दरम्यान सरकार शेतकऱ्यांना आज लेखी आश्वासन देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर तोडगा निघू शकतो.
4/7

त्याआधी काल गिरीश महाजन यांच्याशी आमदार जे पी गावित यांनी चर्चा केली. मात्र लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. मोर्चेकरी शेतकऱ्यांनी कालची रात्र नाशिक-मुंबई महामार्गावरच घालवली.
5/7

6/7

किसान लाँग मार्चचा फटका बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मोर्चा निघाल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक थांबवल्याने अनेक परीक्षार्थी आणि शिक्षक, सुपरवायझर अडकले आहेत.
7/7

किसान मार्च सुरु होताच मुंबई नाका परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हजारो आंदोलक मोर्चात सहभागी झाले आहेत.
Published at : 21 Feb 2019 10:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
