Yavatmal News : ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले दस्तावेज; यवतमाळच्या सायखेडा मधील ग्रामसभेच्या आदल्या रात्रीची घटना
Yavatmal News : यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज जाळल्याचा प्रकार उघडकीस आला.

Yavatmal News : यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे दुसऱ्यादिवशी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. दरम्यान, भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, सायखेडा ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी केल्या होत्या. परंतु, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. या प्रकरणी चौकशी करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान पांढरकवडा पोलीस ठाण्याचे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. ही दस्तऐवज कोणी आणि काजले याचा तपास पोलीस करीत आहे.
निधी अभावी पाणीपुरवठा योजना बंद पडल्यानं उपसरपंचानं केलं भिक मांगो आंदोलन
हर घर नल, ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना भंडाऱ्याच्या तुमसरात निधी अभावी बंद पडली आहे. त्यामुळं ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा प्रकार परसावडा, खापा, तुडका, तामसवाडी, ढोरवाडा आदी गावांमध्ये बघायला मिळत आहे. एकीकडं राज्य सरकार लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्याचं बहिणींना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यानं राज्य सरकारनं पाणी पुरवठा योजनेसाठी निधी द्यावा, अशी मागणी परसवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच पवन खवास यांनी प्रशासन आणि राज्य सरकारकडं वारंवार केली. मात्र, प्रशासन आणि राज्य सरकारनं योजनेला निधी दिला नाही. किंबहुना शासनाकडं निधी नसल्याची बाब अधिकारी सांगत असल्यानं आज परसवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच पवन खवास यांनी राज्य सरकारला पाठविण्यासाठी एक एक रुपया असं "भीक मांगो आंदोलन" करून जमा झालेली रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्याला दिली. पवन खवास यांच्या भिक मांगो आंदोलनानं प्रशासकीय यंत्रणेत चांगलीचं तारांबळ उडाली.
गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने घर व गोठ्याला लागली आग
स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने घर व गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. यात घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू व साहित्य जळून राख झालीय. हि घटना गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील जामखारी येथे घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत घरातील अन्न, धान्य, शेती अवजारे, रोख रक्कम, सोने, चांदी, कपडे आदी साहित्य पूर्णपणे जळून राख झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























