एक्स्प्लोर

दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेचा मोठा निर्णय, चेहरा झाकणाऱ्या सर्व कपड्यांवर बंदी

श्रीलंकेत ईस्टर सण्डेला चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटात 500 नागरिक जखमी झाले होते. काही दिवसांनी दहशतवादी संघटना आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

कोलंबो : श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सरकारने चेहरे झाकणारे सर्व पेहराव, कपडे आणि मास्कवर बंदी घातली आहे आहे. राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "लोकांची ओळख पटवण्यात अडचण निर्माण होणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. हे लोक राष्ट्रीय किंवा सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका ठरु शकतात. हा आदेशाची आज 29 एप्रिलपासून तातडीने लागू होत आहे." आजपासून लागू झालेल्या या बंदीमध्ये मुस्लीम महिला परिधान करत असलेल्या नकाब किंवा बुरख्याचा उल्लेख नाही. पण सरकारच्या या निर्णयाचा परिणा बुरखा आणि नकाब परिधान करणाऱ्या महिलांवरही होणार आहे. श्रीलंकेत ईस्टर सण्डेला चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटात 500 नागरिक जखमी झाले होते. काही दिवसांनी दहशतवादी संघटना आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी अशी पावलं उचलणाऱ्या देशामध्ये श्रीलंकेचा समावेश झाला आहे. याआधी आशिया, आफ्रिका, युरोप या खंडातील काही निवडक देशांनी हा निर्णय घेतला होता. चॅड, कॅमरुन, गाबोन, मोरोक्को, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम, आणि उत्तर-पश्चिम चीनमधील मुस्लीमबहुल शिनजियांग प्रांतात बुरखा परिधान करण्यावर बंदी आहे. कायदे मंत्र्यांना मसुदा बनवण्याच्या सूचना श्रीलंकन सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "पंतप्रधानांनी कायदे मंत्र्यांना याबाबत एक मसुदा तयार करण्यास सांगितलं होतं. तसंच कायदे मंत्र्यांनी श्रीलंकेतील मुस्लीमांच्या धर्मगुरुंची प्रमुख संस्था आयसीजेयूच्या अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करुन मसुदा तयार करावा, असंही पंतप्रधानांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे आयसीजेयूने स्वत:च एक प्रस्ताव मंजूर करुन चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालावी असं आवाहन सरकारला केलं होतं." कट्टरतावादी संघटनांवर बंदी नॅशनल तौहीद जमात ही कट्टरतावादी इस्लामी संघटना श्रीलंकेतील बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. हे आत्मघाती हल्लेखोर इस्लामिक स्टेटपासून प्रभावित असल्याचं सरकारने सांगितलं. या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या सरकारने अशाप्रकारची अनेक पाऊलं उचलली आहेत. राष्ट्रपतींनी नॅशनल तौहीद जमात आणि जमियत मिल्लत इब्राहिम यांसारख्या संघटनांवर बंदी घातली आहे. या संघटनांची कार्यलयं सील केली असून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसंच सरकार आणखी काही संघटनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. संबंधित बातम्या श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयसिसने स्वीकारली श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू होणार, राष्ट्रपतींची घोषणा श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget