एक्स्प्लोर

Wardha News : धक्कादायक! बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव 

Wardha News Update : बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे.

वर्धा :  बोकड चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे. सुरेश देवराव आत्राम (वय 42 रा.वनग्राम (चौकी) ता हिंगणा, जिल्हा नागपूर ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अविनाश वसंतराव वासकर ( वय 35 रा, खापरी ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

संशयित आरोपी अविनाश याने सुरेश याला आपल्या गाडीवर बसवत शेतात नेऊन बोकड चोरल्याच्या करणातून त्याच्याशी भांडण काढले. यातून दोघांमध्यी वाद वाढला. त्यातूनच अविनाश याने सुरेश याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. यात सुरेश गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे डॉक्टरंनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला. अखेर गुरुवारी सकाळी गावातूनच ताब्यात अविनाश याला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश हा बुधवारी वर्ध्याहून परत आल्यानंतर दुपारी तीन वाजता तो खापरी येथे पानटरीवर बसला होता. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने त्याला तेथून गाडीवर बसून आपल्या शेतात नेले. तेथे त्याला  काठीने जबर मारहाण करण्यात आली. तेथून सुरेशने पळ काढला. परंतु, जबर मारहाण झाल्याने  तो तेथेच जमिनीवर कोसळला. पुन्हा त्या ठिकाणीही अविनाश याच्याकडून मारहाण करण्यात आली. सुरेश रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर रिंग जात होती, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता.
 

आरोपीनेच फोन उचलून दिली माहिती 
फोन वाजत असल्याने आरोपी अविनाश वासकर यानेच सुरेशचा फोन उचलला आणि सुरेश हा रोडवर पडून असल्याचे कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे गावातील काही तरुण रात्री साडेनऊच्या दरम्यान  घटनास्थळी गेले असता सुरेश हा खापरी येथील गायमुख रोडवर नाल्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळले. त्याच्या हातापायावर तसेच पाठीवर मारहाणीच्या जखमा होत्या. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन बोकड गेले होते चोरीला  
सुरेश आणि अविनाश हे दोघेही चांगले मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी ये-जा होते. अविनाश याचे काही दिवसांपूर्वी दोन बोकड चोरीला गेले होते. या संशयातूनच आरोपीने सुरेशला खापरी येथील आपल्या शेतात नेत त्याला मारहाण करून नाल्याजवळ गायमुख रस्त्यावर आणून टाकले. हत्या केल्याची तक्रार सुरेशच्या आईने पोलिसांत दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याप्रकरणी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. सेलू पोलिसांनी रात्रभर खापरी तसेच जंगल परिसरात आरोपीचा शोध घेतला. अखेर आज सकाळी सात वाजता तो गावातच सापडला, त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोहळे पुढील तपास करीत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget