Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Watermelon Impact On APMC : मुंबईतील घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल विक्रीअभावी पडून आहे. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेते संकटात सापडल्याचं चित्र आहे.

मुंबई : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर कलिंगडाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kalyan APMC) तब्बल 10 ते 12 ट्रक कलिंगडाचा माल विक्रीअभावी पडून (Watermelon Sales) आहे. ग्राहकांनी अचानक कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आणि विक्रेते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. किमान उत्पन्न भावही भरून निघतोय की नाही याची चिंता आता त्यांना पडल्याचं चित्र आहे.
मुंबईत एका कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि त्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने या मृत्यूचा कलिंगडाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Watermelon Market Impact : बाजारात पडून राहिला लाखोंचा माल
उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाला मोठी मागणी असते. दररोज कोट्यवधी रुपयांची फळांची आवक होणाऱ्या या बाजारात सध्या कलिंगडाच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. चार दिवसांपासून ट्रकमध्ये पडून असलेल्या मालामुळे मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होऊ लागले आहे. परिणामी विक्रेत्यांवर तो माल फेकून देण्याची वेळ आली आहे.
Watermelon Price Drop : दर कोसळले, तरीही ग्राहक नाही
घटनेपूर्वी किरकोळ बाजारात कलिंगड 50 रुपये प्रति किलो दराने विकले जात होते, तर मोठ्या आकाराच्या कलिंगडाला 80 ते 100 रुपये प्रति किलो दर होता. मात्र आता दर घसरले असतानाही ग्राहक खरेदीसाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे.
Watermelon Farmer Crisis : शेतकरी आणि ट्रक चालक अडचणीत
अहिल्यानगर, बीड, नाशिक येथून कलिंगड घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आणि ट्रक चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. विक्री होत नसल्याने उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही निघत नाही. वाहनांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न चालकांसमोर उभा ठाकला आहे.
FDA Clarification On Watermelon : प्रशासनाचा निर्वाळा, तरीही भीती कायम
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की मुंबईतील मृत्यू कलिंगडामुळे झालेले नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी भीती न बाळगता फळांचे सेवन करावे, असे आवाहन केले आहे. तरीदेखील नागरिकांच्या मनातील भीती कमी होत नसल्याने त्याचा थेट फटका शेतकरी आणि विक्रेत्यांना बसत आहे.
ही बातमी वाचा:






















