एक्स्प्लोर

Facebook Fuel for India 2020: मार्क झुकरबर्गला मुकेश अंबानी म्हणाले- भारताचा समावेश आता जगातल्या टॉप 3 अर्थव्यवस्थेत असेल

मंगळवार पासून Facebook Fuel for India 2020 या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात भारताच्या अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यात डिजिटलायझेशन आणि लहान उद्योगांची भूमिका या विषयावर फेसबुकच्या (Facebook) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि रिलायन्सच्या (Reliance) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला बुधवारी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.

मुंबई: भारतात 'Facebook Fuel for India 2020' या कार्यक्रमाचं आयोजन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकनं केलं आहे. या कार्यक्रमात मंगळवारी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि रिलायन्सच्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी डिजिटलायझेशन आणि लहान उद्योग कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात या विषयावर चर्चा झाली.

जगाच्या टॉप 3 अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश असेल या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचा कारभार करताना आपली प्रमुख धोरणं, आराखडे आणि व्यावसायिक संबंध यांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "कोरोनाच्या संक्रमण काळातही भारत चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे. येत्या काही काळात जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश असेल. हा देश एक प्रमुख डिजिटल समाज होण्याचा मार्गावर आहे आणि याची दोरी युवकांच्या हातात असेल. भारताचा प्रति व्यक्ती उत्पन्न 1800-2000 अमेरिकन डॉलर्सवरुन वाढून 5000 अमेरिकन डॉलर्सवर पोहचेल."

मुकेश अंबानी यांनी मार्क झुकरबर्गशी बोलताना सांगितलं की, "जिओने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. WhatsApp Pay सोबत WhatsApp चॅटचा समावेश आहे, त्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. रिलायन्स आणि जिओ मार्टच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय जागतिक सुविधांचा लाभ घेऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने भारताच्या संपत्तीत वाढ होईल."

डिजिटल इंडिया मोहीमेला श्रेय रिलायन्स उद्योगसमुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारतातील डिजिटल सेवांच्या उपलब्धीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या मोहीमेला दिलं. त्याचबरोबर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या परकीय गुंतवणुकीबद्दल झुकरबर्गचे आभार मानले.

दोन दिवस असेल कार्यक्रम मंगळवारी सुरु झालेला Facebook Fuel for India 2020 हा कार्यक्रम दोन दिवस चालेल. फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शरिल सँडबर्ग, इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी आणि WhatsApp चे प्रमुख विल कॅथकार्ट या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात बुधवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.

हा आहे कार्यक्रमाचा उद्देश फेसबुक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहान यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की, "आम्ही भारतात फेसबुकच्या काही गोष्टी शेअर करणार आहोत. ज्यामुळे आम्ही नेमकं काय करणार आहोत हे भारतीय युजर्सना सहज समजेल."

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget