एक्स्प्लोर

माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांना टीम इंडियाची मैदानावर अनोखी आदरांजली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या वन-डे सामन्याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदाता सुरु आहे. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघ आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर उतरला आहे.

बंगळुरु : ऑस्ट्रलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडिया मालिका विजयाच्या इराद्याने उतरली आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाने आणखी एक गोष्ट करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर पाऊल टाकलं. भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी काळी पट्टी लावली आहे. बीसीसीआयने देखील आपल्या ट्विटर हॅंडलवरुन नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. नाडकर्णी यांनी 1955 ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध 1968 साली खेळला होता. नाडकर्णींच्या नावावर कसोटीमध्ये एका डावात सलग 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. त्यांनी 1964 मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग 21 षटकं निर्धाव टाकली होती. भारताचे माजी कसोटीवीर रमेशचंद्र उर्फ बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अचूक टप्पा आणि अचूक दिशा राखणारा डावखुरा फिरकी गोलंदाज अशी बापूंची एका जमान्यात ख्याती होती. नाडकर्णी यांनी कारकीर्दीतल्या 41 कसोटी सामन्यांत 1411 धावा आणि 88 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती. 43 धावांमध्ये 6 विकेट्स ही त्यांची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी होती. बापूंनी प्रथम दर्जाच्या 191 सामन्यांमध्ये 8 हजार 880 धावा आणि 500 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर यांनी बापूंना आदरांजली वाहिली होती. सलग 21 निर्धाव षटकं टाकण्याच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भारताचा कसोटीमधील सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. चेन्नईमधील एका सामन्यात त्यांनी 32 षटकांपैकी 27 षटकं निर्धाव टाकली होती. 32 षटकात त्यांनी अवघ्या 5 धावा दिल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात बापूंनी 34 षटकं गोलंदाजी केली होती. त्यापैकी 24 षटकं त्यांनी निर्धाव टाकली होती. त्यात त्यांनी अवघ्या 23 धावा दिल्या होत्या. त्याच मालिकेत दिल्लीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी 34 षटकात 24 धावा देत एक बळी मिळवला होता. या डावातही त्यांनी तब्बल 24 षटकं निर्धाव टाकली होती. संबंधित बातम्या 
माजी क्रिकेटर बापू नाडकर्णींचं निधन, सचिन आणि गावस्करांकडून आदरांजली

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भिवंडीत विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात एकच खळबळ
धक्कादायक! भिवंडीत विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात एकच खळबळ
Mexico City FIFA World Cup 2026 : दोन गोल, सेलिब्रेशनसाठी रस्त्यावर 10 लाख चाहते अन् 3 जणांचा मृत्यू! ऐतिहासिक विजयानंतर मेक्सिकोत काय घडलं?
दोन गोल, सेलिब्रेशनसाठी रस्त्यावर 10 लाख चाहते अन् 3 जणांचा मृत्यू! ऐतिहासिक विजयानंतर मेक्सिकोत काय घडलं?
बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, मृत विकास घुलेच्या पत्नीला भोवळ; पोलीस तात्काळ घटनास्थळी, कारवाईचं आश्वासन
बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, मृत विकास घुलेच्या पत्नीला भोवळ; पोलीस तात्काळ घटनास्थळी, कारवाईचं आश्वासन
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
Embed widget