एक्स्प्लोर

आघाडी सरकारच्या काळात 109 दिवस सुरु असलेलं मनोज जरांगेंचं आंदोलन आम्ही सोडवलेलं, आता सरकारनंही मार्ग काढावा : सुप्रिया सुळे

Supriya Sule On Maratha Reservation: महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच मनोज जरांगे 109 दिवस आंदोलनाला बसले होते. तेव्हा त्यावेळचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शांततेने प्रेमाने बोलून कसा मार्ग काढला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule On Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाल्या आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे. सरकारकडून (Maharashtra Government) जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, जरांगे मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Copngress Party) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच मनोज जरांगे 109 दिवस आंदोलनाला बसले होते, त्यावेळ पालकमंत्री राजेश टोपे होते, त्यावेळी राजेश टोपे यांनी प्रेमानं, शांततेनं बोलून मार्ग काढला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच, आताच्या सरकारनंही यातून मार्ग काढावा, सरकार कशासाठी आहे, मायबाप जनतेसाठी आहे. गाड्या, हेलिकॉप्टर आणि प्रायव्हेट प्लेनमधून फिरण्यासाठी नाही, असं देखील सुप्रीया सुळे म्हणाल्या होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रीया सुळे बोलताना म्हणाल्या की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच मनोज जरांगे 109 दिवस आंदोलनाला बसले होते. तेव्हा त्यावेळचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शांततेने प्रेमाने बोलून कसा मार्ग काढला, आता या सरकारनं देखील मार्ग काढावा."जरांगे यांच्या आंदोलनात लाठीचार्ज होतो कसा? असा सवाल उपस्थित करत आम्ही प्रेमानं आणि गोड बोलून आंदोलन सोडवलं आणि यांनी जालियनवाला बाग केला, आंदोलकांची, महिलांची डोकी फोडलीत, असाही टोलाही सुप्रिया सुळेंनी यावेळी लगावला.

सोमवारी सुप्रिया सुळे पंढरपूर आणि मंगळवेढा दौऱ्यावर असताना त्यांनी अभिजित पाटील यांच्या घरी भेट दिली असता, त्या बोलत होत्या. आज पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी अभिजित पाटील, जयमाला गायकवाड, सुभाष भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मार्ग निघत नसल्यानं हतबल झाले असताना आज सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. सरकार म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरायचं नसतं, तर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. आघाडीच्या काळात देखील आम्ही आंदोलकांना प्रस्ताव दिले होते. आता हे सत्तेत आहेत ना मग त्यांनी काढावा मार्ग अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली. आम्हाला कधीही चर्चेला बोलवावं आम्ही यासाठी तयार आहोत, असाही टोला लगावला. 

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या आरोपांवर मात्र सुप्रिया सुळे यांनी बगल देत शिवसेना फुटल्यावर राष्ट्रवादी सत्तेत जाणार होती आणि त्यासाठी सह्यांचे पत्र तयार होते. याबाबत आपणास काहीही माहित नसून मी आमदार नाही, असा टोला लगावला. राज्य सरकार लोकांना सरकारी सेवेत कायम करायच्या मानसिकतेमध्ये नसल्यानं सध्या नवीन भरती कंत्राटी पद्धतीवर करायचं धोरण सुरु केलं आहे. यामुळे सरकारी नोकरी म्हणजे, सुरक्षिततेची भावना होती तीच संपवायचं काम हे सरकार करत असल्याचा घणाघात केला. गरज असेल तेव्हा घ्यायचं आणि गरज संपली की काढून टाकायचं, असा उद्योग हे सरकार करत आहे. या सरकारचं धोरण सर्वच ठिकाणी अपयशी होत असून राज्यातील दुष्काळ, मराठा, धनगर आरक्षण, एसटी, आरोग्य, शिक्षण या सर्वच प्रश्नात या सरकारला अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केंद्रातील सरकार तर ICE वर आपलं सरकार चालवत असल्याचा टोलाही मोदी सरकारला लगावला. लोकसभेचं खास अधिवेशन बोलावलं पण त्याचा अजेंडाच नाही, शून्य प्रहर नाही, प्रश्नोत्तर नाही मग अधिवेशन कशाचं? असा सवाल केला. म्हणूनच आम्ही त्यांना आता आमचा अजेंडा पाठवल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget