एक्स्प्लोर

उजनी धरणातून नुसता गाळ काढला तरी सरकारला 9 हजार कोटी मिळतील, 11 TMC पाणीही वाढेल, नेमकं गणित काय?

Ujani Dam : उजनी धरणात १० कोटी ६० लाख ब्रास गाळ , गाळ काढण्याचा निर्णय घेतल्यास धरणात ११ टीएमसी पाणी साठवण वाढणार .. शासनाला नुसत्या वाळूतून किमान ९ हजार कोटीचे उत्पन्न मिळणार ..   माझा स्पेशल 

Ujani Dam News  : उजनी धरणातून सगळा गाळ काढला तरी सरकारला 9 हजार कोटी रुपये मिळतील, त्याशिवाय धरणातील 11 टीएमसी पाणी साठवण वाढेल. पण त्यासाठी सरकारला गाळ काढण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागले. उजनी धरणात 10 कोटी 60 लाख ब्रास गाळ आहे, तो काढण्यासाठी सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. 

उजनी धरणाने तिची नीचांकी पातळी गाठल्याने जलाशय बऱ्याच ठिकाणी कोरडा पडला असून शासनाने गाळ काढण्याबाबत तातडीने निर्णय घेतल्यास लाखो रुपयांची वाळू देखील मिळू शकणार आहे. उजनी धरणाचे बांधकाम 1969 साली सुरु होऊन जून 1980 साली यात पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. गेल्या 44 वर्षात धरण आणि त्याच्या जलाशयात तब्बल 10.64  टीएमसी म्हणजे तब्बल 10 कोटी 60 लाख ब्रास एवढा गाळ साठल्याचा अहवाल शासनाने नेमलेल्या गाळ निश्काशन प्रारूप निविदा समितीने 22 मे 2023 रोजी दिला होता .  यानंतर शासनाने सर्व क्षेत्रीय कार्यालयाकांडून अभिप्राय मागवला असून अजून हा अभिप्राय प्राप्त न झाल्याने उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय होऊ शकला नसल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले . 

धरणातील गाळ काढण्याचे काम 10 वर्ष कालावधीचे असणार असून ज्या ज्या वेळी पाणी कमी होईल त्यावेळेत हा गाळ काढता येणार आहे. उजनीचे बुडीत क्षेत्र 30 हजार हेक्टर असून नाशिकच्या मेरी या शासनाच्या संस्थेने केलेल्या तपासणीनुसार उजनी धरणात 10.64 टीएमसी एवढा गाळ आहे . यामध्ये मृत साठ्यात 3.99 टीएमसी तर उपयुक्त साठ्यात 6.65 टीएमसी एवढा गाळ आहे. हा गाळ काढल्यानंतर आता कागदावर दिसणारे 10.64 टीएमसी एवढे खरे पाणी यात साठणार असून याचा मोठा फायदा दुष्काळी परिस्थितीत करता येऊ शकणार आहे.

उजनी धरणातून निघणारा गाळ हा शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार असून  गाळातील वाळू वेगळी करून तिच्या विक्रीतून मोठा महसूल शासनाला मिळू शकणार आहे. यासाठी ठिकठिकाणच्या गाळाचे सँपलं घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. उजनी धरणाच्या गाळात  कमीतकमी २० ते ३० टक्के एवढे वाळूचे प्रमाण असून यातून किमान 2.23 कोटी ब्रास वाळू मिळणार आहे. ज्याची बाजारभावानुसार किंमत 9 हजर कोटी इतकी होते. शासनाने तातडीने उजनी मधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे कागदावरचे पाणी धरणात जमा होऊन याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो . हे पाणी धरणात साठण्यास सुरुवात झाल्यावर किमान 1 लाख हेक्टर जमिनीला पाणी देता येणार आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Embed widget