एक्स्प्लोर

Sharad Pawar: असेही अनोखे नाते , ब्याऐंशीव्या वर्षी पवार सपत्नीक पोहचले मंगळवेढ्यात लग्नाला

समाज बांधव , ग्रामस्थ यांनी यामुळे लतिफ भाई यांची टिंगल देखील केली . मात्र लतिफ भाई यांचा आपल्या साहेबांवर अपर श्रद्धा असल्याने साहेब विवाहाला येणार हा विश्वास होता.

सोलापूर: शरद पवार ( Sharad Pawar)  हे खरेच अजब रसायन आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळाले . कायम माणसात रमणारे पवार साहेब एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी थेट हेलिकॉप्टर घेऊन मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात पोहचलो आणि तेही सपत्नीक... मंगळवेढा तालुक्यातील लतिफ तांबोळी यांच्या मुलीचा विवाह मरावडे या ठिकाणी आयोजित केला होता . लतिफ हे पहिल्यापासून पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत . आपली कन्या हिना हिच्या विवाहाची पत्रिका काही दिवसापूर्वी लतिफ यांनी पवार यांना देऊन लग्नाला येण्याची विनंती केली होती.

 लतिफ यांनी पवार यांचा कार्यक्रम पाहून शनिवारी विवाह मुहूर्त धरला होता. मुस्लिम समाजात शुक्रवार अर्थात जुम्मा आणि अकराची वेळ शुभ मानतात. मात्र आपल्या साहेंबाना शनिवारी दुपारी तीन वाजता वेळ आहे हे पाहून रूढी परंपरा मोडत शनिवारी दुपारी तीन वाजता विवाह ठेवला. समाज बांधव , ग्रामस्थ यांनी यामुळे लतिफ भाई यांची टिंगल देखील केली . मात्र लतिफ भाई यांचा आपल्या साहेबांवर अपर श्रद्धा असल्याने साहेब विवाहाला येणार हा विश्वास होता. ठरल्या वेळेला मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात ग्रामस्थ विवाहासाठी जमले आणि आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज येऊ लागल्यावर सर्वच अवाक झाले.  विवाह वेळेपूर्वी शरद पवार यांचे हेलिकॉप्टर मरावडे गावात उतरले.

 पवार यांनी चक्क विवाहाला सपत्नीक हजेरी लावल्याने लग्नासाठी आलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतेही चाट पडले. पवार अगदी खास किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील तरच पत्नी प्रतिभा ताई यांच्या सोबत दिसतात . मात्र मंगळवेढा तालुक्यातील एका साध्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहासाठी हेलिकॉप्टर घेऊन सपत्नीक पवार आल्याने आजही गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी आपली नाळ या वयातही किती घट्ट आहे याचे प्रत्यंतर महाराष्ट्राला आले.
 
  पवार यांची राजकीय कारकीर्द पुणे जिल्ह्यातून सुरू झाली असली तरी सोलापूर जील्ह्यावरचे त्यांचे खास प्रेम कधीच लपून राहिलेले नाही. त्यामुळेच त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील माढा लोकसभा मतदारसंघातून लढली होती. गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीच्या हातातून निसटून भाजपचा बालेकिल्ला बनत असल्याची सल पवार यांच्या मनात आहे. यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मंगळवेढा पोटनिवडणुकीत झालेला पराभव पवार यांना जिव्हारी लागला. 

तीन टर्म विजयी झालेले आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यात आघाडी सरकारची सत्ता असूनही राष्ट्रवादीला हातातील जागा गमवावी लागली होत . त्यामुळे 80 व्या वर्षीही पुन्हा कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी पवार मरवडे सारख्या छोट्याश्या गावात पोहचले . पवारांच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांशी असलेल्या या अनोख्या नात्यामुळे नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते मात्र कायम आपल्या साहेबांच्या साथीला का उभे राहतात याचे गमक मरावडे येथील विवाह सोहळ्यातून समोर येते . 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर हादरलं!
नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर हादरलं!
Solapur Car Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
Rajan Patil : माढ्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण, अंजनगावातील वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला; म्हणाले, स्थलांतर एकमतानंतरच...
माढ्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण, अंजनगावातील वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला; म्हणाले, स्थलांतर एकमतानंतरच...

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget