एक्स्प्लोर

Ajit Pawar: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर अजित पवारांनी राजकीय पक्षांना सुनावलं; म्हणाले, 'प्रत्येकाने तारतम्य...'

Shivaji Maharaj statue collapse: दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावर आले होते. मात्र नेमक्या त्याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

Ajit Pawar: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेवरुन राज्यभरातील वातावरण तापले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. असं असतानाच आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज(शुक्रवारी) सकाळी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) या घटनेत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

तर बुधवारी किल्ल्यावर या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावर आले होते. मात्र नेमक्या त्याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. तर बघता बघता शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारी पर्यंत जाऊन पोहचल्याचे बघायला मिळाले. या पवित्र ठिकाणी राजकीय संघर्ष दिसून आला यावर बोलताना अजित पवार म्हणाले, 'हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे, मी वारंवार सांगतो, संयुक्त महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण, त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कशा पध्दतीने तिथे राजकारण झालं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे,या सर्व गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवल्या आहेत, उभ्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी अनेक पदं भूषवली. त्यांचा इतिहास वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे आमच्यासह सर्व राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तेथील कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काहीही करता कामा नये असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. 

तर ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे असा सल्लाही अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे. 

आम्ही पाहणी करायची नाही का? 

सर्व नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतरचा अंतिम रिझल्ट जनतेसमोर कधी येईल या पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही पाहणी करायची नाही का? याबाबात चर्चा करत असताना नेमकी परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ते पाहणं गरजेचं आहे. इतरांनी पाहणी कू शकतात आम्ही त्यामुळे पाहणी करत आहोत, ते आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे, त्या भावनेतून आम्ही आलो आहोत, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. 

नेमकं काय घडलं?

घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, महाविकास आघाडीतील काही नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले. नेमके त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. 

कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केलं. महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकसुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. हा राडा एका बाजूनं सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेसुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता, किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डिझेलच्या दरात वाढ, एसटी महामंडळाला 310 कोटींचा तोटा, भविष्यात भाडेवाढ होणार? मंत्री सरनाईकांनी दिले संकेत
डिझेलच्या दरात वाढ, एसटी महामंडळाला 310 कोटींचा तोटा, भविष्यात भाडेवाढ होणार? मंत्री सरनाईकांनी दिले संकेत
Maharashtra Weather : अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेवरून महायुतीत मोठा ‘गृहकलह’; कोकणच्या जागेसाठी राजन साळवी विरूद्ध तटकरे सामना, पुण्यात राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा डोळा, नेमकं काय घडतंय?
विधान परिषदेवरून महायुतीत मोठा ‘गृहकलह’; कोकणच्या जागेसाठी राजन साळवी विरूद्ध तटकरे सामना, पुण्यात राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा डोळा, नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget