एक्स्प्लोर

Shirdi SaiBaba Birthplace Conflict | साईंच्या जन्मस्थळाच्या वादामुळं पुकारलेला शिर्डी बंद मागे

साई बाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन मध्यरात्रीपासून शिर्डीत बेमुदत बंद पाळण्यात आला. शिर्डी परिसरातील जवळपास 30 गावांनी या बंदला पाठिंबा देत गावांत बंद पाळण्यात आला.

शिर्डी : जन्मस्थळाच्या वादामुळं मध्यरात्रीपासून पुकारलेला शिर्डी बंद मागे घेण्याचा निर्णय शिर्डीकरांनी केला आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या बैठक बोलावली आहे. तोवर बंद मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांकडे केली होती. त्यानुसार अखेर शिर्डीकरांनी बंद मागे घेतला आहे. पण उद्याच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारला जाईल, असा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. दरम्यान साई बाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन मध्यरात्रीपासून शिर्डीत बेमुदत बंद पाळण्यात आला होता. शिर्डी परिसरातील जवळपास 30 गावांनी या बंदला पाठिंबा देत गावांत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये साईमंदिर मात्र भाविकांसाठी सुरु ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदला परभणी आणि पाथरीकरांनी साई जागराने प्रत्युत्तर दिलं होतं. साईंच्या भजन आणि किर्तनात पाथरीकर दंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या साई जागर आंदोलनात शिवसेना खासदार संजय जाधवही सहभागी झाले होते. जन्मस्थळाचा वाद निर्माण न करता शिर्डीकरांनी सद्बुद्घी मिळो, अशी प्रार्थना पाथरीकरांनी केली आहे. जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे आज शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. काय आहे पाथरीकरांचा दावा पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थाननं 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावानं करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलं आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचादेखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी 1972 ते 75 मध्ये साईचरित्राची आठवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर पाथरी संस्थानचे विश्वस्त विश्वासराव खेर आणि सीताराम धानू हे द्वयी शिर्डी संस्थानचेही विश्वस्त होते. त्यामुळे सदर प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. याबाबत संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे म्हणाले की, आठवी आवृत्ती गायब आहे, याबाबत आम्हाला आताच माहिती मिळाली आहे, आम्ही यावर चौकशी करणार आहोत. शिर्डी संस्थानने साईचरित्राच्या आतापर्यंत 36 आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. त्यापैकी नेमकी आठवी आवृत्ती मंदिर संस्थानच्या दप्तरांमधून गहाळ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे इतक्या आवृत्त्यांपैकी केवळ आठवी आवृत्तीच कशी गायब झाली? असा सवाल पाथरीकर उपस्थित करत आहेत. काय आहे वादामागील कारण? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत 100 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादाला तोंड फुटले. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget