एक्स्प्लोर

Shankarrao Kharat Janmashtabdi Sahitya Sammelan : डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाची सांगता

Shankarrao Kharat Janmashtabdi Sahitya Sammelan : डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडीत श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरीत आयोजित दोनदिवसीय साहित्य संमेलनाची सांगता झाली आहे.

Shankarrao Kharat Janmashtabdi Sahitya Sammelan : डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडीत श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरीत आयोजित केलेल्या दोनदिवसीय साहित्य संमेलनाची सांगता झाली. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाची सांगता झाली. 

राम नाईक आणि राजीव खांडेकर यांना मानपत्र प्रदान

संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात राम नाईक आणि राजीव खांडेकर यांनी डॉ. शंकरराव खरात यांच्या संघर्षातून निर्माण झालेले साहित्य आणि त्यांच्या एकूण कार्याला उजाळा दिला. यावेळी राम नाईक आणि राजीव खांडेकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी खरात यांच्या स्मारकासाठी एक एकर जागा दिल्याबद्दल राम नाईक आणि राजीव खांडेकर यांनी त्यांचे कौतुक केले आणि स्मारक आणि तालुक्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली. सांगता समारोपात काही ठराव देखील मंजूर करण्यात आले. 

सांगता समारोपात काही ठराव देखील मंजूर

ज्यामध्ये शंकरराव खरात यांचे स्मारक उभारावे, कृषी विद्यापीठ स्थापन करावे, खरात यांचे साहित्य शासनाने प्रसिद्ध करावे आणि अभ्यासक्रमात ते समाविष्ट करावे, टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाइपलाइन मार्फत द्यावे आणि त्याची आवर्तन निश्चित करावीत, ५३ गावांची धनगाव योजना पूर्ण करावी, आटपाडी तालुक्याला रेल्वेने जोडले जावे, असे ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

आटपाडीच्या वेशीबाहेर जन्मलेल्या डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्य नगरी उभारून साहित्य संमेलन भरतयं हे सामाजिक उन्नतीचे उदाहरण आटपाडी आणि राज्याने पाहिले असेल असं मला वाटत नाही. हा वसा संमेलनातून परतताना घेतला पाहिजे असे प्रतिपादन उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय नेते राम नाईक यांनी केले. शंकरराव खरात यांनी आपल्या आत्मचरित्रातून त्यांच्यावर आणि दलित समाजावर झालेला अन्याय व्यक्त करताना वाचकाला प्रेरणा दिली. शाळेबाहेर उभा राहून धडे घेणारा माणूस एका विद्यापीठाचा कुलगुरू होतो ही माझ्या दृष्टीने अभिमानाची घटना आहे. 

दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत चीड,संताप व्यक्त करतानाही त्यात वाचकालाही प्रेरणा देऊन जाणारे साहित्य डॉ.शंकरराव खरात यांनी निर्माण केले असून संपूर्ण समाजाचा ध्यास घेतलेले शंकरराव खरात यांच्या साहित्य संमेलनातून सर्वांनी सामाजिक उन्नतीचा वसा घ्यावा असे उद्गार राम नाईक यांनी काढले.

तर राजकारणाची दिशा बदलली असती

शंकरराव खरात यांना राजकारणात संधी मिळाली असती, तर राजकारणाची दिशा बदलली असती. शंकरराव खरात यांच्यावर सर्वांनी अन्याय केला. दलित साहित्यातील लिखाण डोळ्यात अश्रू उभे करायचे. साध्या आणि सोप्या प्रभावी भाषेतील त्यांच्या लिखाणाचे चीज समीक्षक आणि समाजाने केले नाही. त्यांना मिळालेल्या सर्व भूमिकांना त्यांनी न्याय दिला. डॉ.शंकरराव खरात यांनी दलित साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, शासनाकडून व समाजाकडून त्याच्या कार्याची त्यावेळी दखल घेतली गेली नाही अशी खंत व्यक्त केली. डॉ.शंकरराव खरात यांच्या वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या मंडळींची पुढची पिढी त्याच्या नावाने होत असणाऱ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असल्याचा अभिमान आहे.साहित्याच्या समीक्षक व समाजाने त्याच्या साहित्याची दखल घेतली गेली नाही.

डॉ.शंकरराव खरात याचे आटपाडीत उभारणारे स्मारक हे महाराष्ट्रासह देशभरातील नव्हे, तर जगातील लोक बघण्यासाठी यावेत असे स्मारक उभे रहावे यासाठी माझ्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Sadabhau Khot : गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत
गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Pinarayi Vijayan ED Raid: केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
Embed widget