एक्स्प्लोर

Sangli News : सांगलीत 78 हजार झाडे लावून हरित चळवळ, आमदार सुहास बाबर यांचा संकल्प

Sangli : पूर्वी सांगलीतील अनेक रस्त्यांवर झाडांच्या सावलीमुळे नैसर्गिक 'ग्रीन टनेल' तयार झाले होते. रस्ते रुंदीकरणामुळे नष्ट झालेले हरित बोगदे पुन्हा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सांगली : जिल्ह्यातील खानापूरचे शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्याकडून निसर्ग संवर्धनासाठी 'ट्री आर्मी' या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून 78 हजार झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प करण्यात आला. दुष्काळी आणि कमी पावसाच्या भागात निसर्गाचे संतुलन राखणे आणि वृक्षारोपणाची चळवळ लोक चळवळीत बदलणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. या मोहिमेत हजारो सांगलीकरांनी सहभाग नोंदवला.

आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं.

माजी आमदार अनिल बाबर यांचे पुत्र आणि राजकीय वारसदार असलेल्या सुहास बाबर यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 78,178 मताधिक्याने विजय मिळवला. या मताधिक्याइतकी झाडे मतदारसंघात लावण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यामुळे 78 हजार झाडे लावण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

सांगली जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने एका एकर जागेत मियावकी पद्धतीने घनदाट जंगल विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गायरान जमिनी, रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांमध्ये वड, पिंपळ, बहावा, करंज आणि चिंच यांसारख्या स्थानिक वृक्षांची लागवड केली जात आहे.

या मोहिमेत नागरिक स्वतःहून जागा, पाणी, रोपे आणि श्रमदान उपलब्ध करून देत आहेत. सुहास बाबर यांनी आपल्या मातोश्रींच्या श्राद्धदिनी 5,300 आंब्याची कलमे लावली. तसेच विटा नगरपालिकेतील एका नगरसेवकाने चार वर्षे वाढवलेली 52 झाडे भेट दिली, तर आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण केले आहे.

पूर्वी सांगली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर झाडांच्या सावलीमुळे नैसर्गिक 'ग्रीन टनेल' तयार झाले होते. रस्ते रुंदीकरणामुळे हे हरित बोगदे नष्ट झाले. आता ते पुन्हा निर्माण करण्याचे उद्दिष्ट 'ट्री आर्मी'ने ठेवले आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि प्रवाशांना सावली व थंडावा मिळावा यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त 5 जून रोजी अधिक व्यापक वृक्षारोपण मोहिम राबवण्यात येणार आहे. खानापूर-आटपाडी परिसरातील तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर राहणाऱ्या नागरिकांनीही आपल्या गावाशी नाळ जोडण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आलं आहे. 

ही बातमी वाचा:

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
Embed widget