एक्स्प्लोर

Punjab Assembly Polls 2022: संयुक्त किसान मोर्चाची नोंदणी नाहीच, सर्व उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार

पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनानंतर संयुक्त समाज मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, राजकीय पक्ष म्हणून समाज मोर्चाची नोंदणी झाली नाही.

Punjab Assembly Election 2022: सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनानंतर संयुक्त समाज मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर संयुक्त समाज मोर्चाने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील केली होती. त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली होती. मात्र, राजकीय पक्ष म्हणून संयुक्त समाज मोर्चाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली नाही. त्यामुळे संयुक्त समाज मोर्चाचे उमेदवार आता अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.  

निवडणूक आयोगाकडे संयुक्त समाज मोर्चाची नोंदणी न झाल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. संयुक्त समाज मोर्चाची नोंदणा होऊ न शकल्यामुळे निवडणूक आयोगाने संयुक्त समाज मोर्चाला कोणतेही चिन्ह दिले नाही.  गुरनाम सिंह चढूनी यांच्याबरोबर संयुक्त समाज मोर्चा निवडणूक लढवत आहे. बलबीर सिंह राजेवाल यांच्या नेतृत्वात संयुक्त समाज मोर्चाने 102 उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील केली आहे. त्यानंतर राजेवाल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती.
 
संयुक्त समाज मोर्चाने डिसेंबरमध्ये पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या पंजाबच्या 32 पैकी 22 शेतकरी संघटनांनी बलबीर राजेवाल यांना निवडणूक लढवण्यासाठी आपला नेता मानले होते. मात्र, यापैकी 9 संघटनांनी नंतर निवडणूक लढविण्याच्या निर्णयापासून माघार घेतली होती. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची पडताळणी होणार असून, 4  फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत.

सध्या पंजाबमधील निवडणूक प्रचार रंगात आली आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरणेही बदलत आहेत. प्रत्येक पक्ष प्रचारामध्ये व्यस्त आहे. सत्ताधारी काँग्रेसनेही जोरदार प्रचार सुरु केला आहे. अशातच पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या बातम्याही समोर येत आहे. पंजाब काँग्रेस वारंवार पक्षामध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण देत आहे, पण पडद्याच्या मागील घडामोडी वेगाने घडत आहे. मुख्यमंत्री पदावरुन पक्षात फूट पडल्याचे बोललं जात आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Horoscope Today 23 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget