एक्स्प्लोर

मोठी बातमी : चवदार तळ्यात ओंजळीने पाणी प्यायले, महाडमध्ये जाऊन मनुस्मृती जाळली, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांनी थेट महाड येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन केले आहे. पुन्हा एकदा मनुस्मृती जन्माला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

रायगड : राज्य सरकारने विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या काही भागाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनुस्मृतीतील श्लोकांचाही वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या याच निर्णयाला आता अनेक स्तरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जितेंद्र आव्हाड यांनीही या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे. त्यांनी आज (29 मे) थेट रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आव्हाड यांच्याकडून सरकारच्या निर्णयाला विरोध

जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा थेट विरोध केला आहे. या निर्णयाचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांनी थेट भूमिका घेतली. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आम्ही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करू, असे आव्हाड यांनी जाहीर केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. त्यामुळे मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करण्यासाठी आव्हाड यांनीदेखील हेच स्थान निवडले. 

ओंजळीने पाणी प्यायले, जय भीमच्या घोषणा

आव्हाड यांनी आज (29  मे) चवदार तळ्यावर जात आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच ओंजळीने चवदार तळ्याचे पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच 'जय भीम,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आव्हाड यांच्यासोबत मिलिंद टिपणीस आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांकडून आव्हाड यांना नोटीस

मात्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना महाड पोलिसांकडून आंदोलन रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. कायदा आणि सुव्यव्यवस्था अबाधित राहावी, आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरीता ही नोटीस बजावली होती. मात्र आव्हाड यांनी या नोटिशीला धुडकावून लावत महाडच्या चवदार तळ्यावर मनुस्मृतीचे दहन केले. त्यामुळे पोलीस आव्हाड यांच्यावर काय कारवाई करणार, असे विचारले जात आहे.  

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

अनेक समाज बांधवांनी एकत्र येऊन तेव्हा मनुस्मृतीला विरोध केला होता. मनुने स्त्रियांविषयी क्रोध, द्वेष, निंदा व्यक्त केलेली आहे. काही निवडक लोकं महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. एकीकडे संविधान बदलण्याचा कारनामा सुरू आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. 

मिलिंद टिपणीस काय म्हणाले?

पाठ्यपुस्तकात मनुस्मृती दाखविणे, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणे हा आचारसंहितेचा भंग नाही का? अस्पृश्य समाजाला हीन वागणूक मिळाल्याने बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. ती प्रथा आता बंद झालेली असताना पुन्हा मनुस्मृती कशाला पाहिजे. पुढाऱ्यांना देशातला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. सरकारला अभ्यासक्रमात संतांच्या अभंगांचा समावेश का करावासा वाटला नाही. तथागत गौतम बुद्ध हे सर्वात मोठे आहेत, त्यांच्याही विचारांचा समावेश होणे गरेजेचे होते. बहुजन तरुणाने या बाबतीत विचार करणे गरजेचे, असे मिलिंद टिपणीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget