एक्स्प्लोर

रायगडच्या विधानसभेत बळीराज सेना ओबीसी समाजाला एकवटण्याच्या तयारीत; महायुतीला फटका बसण्याची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha Election: रायगड जिल्हयात जास्त ओबीसी समाज असल्याने याचा फायदा घेण्यासाठी बळीराज सेना पक्ष सुधा आगेकूच करताना दिसतंय.

Maharashtra Vidhan Sabha Election रायगड: रायगड जिल्ह्यात सध्या महायुतीची सत्ता आहे. यामध्ये भाजप 3, शिवसेना (शिंदे गट)3 आणि राष्ट्रवादी 1 अशी सात आमदारांची संख्या आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा अशीच जागा वाटपाची स्थिती राहते का ते पाहणे महत्वाचे ठरेल. मंत्री उदय सामंत यांनी येत्या 20 ऑगस्ट पर्यंत महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल अस वक्तव्य केलंय, मात्र महायुतीमध्ये सुरू असलेली अंतर्गत वादाची कारणे सुटली नाहीत तर हा खेळ खेळणे महायुतीला अवघड जाणार आहे. 

रायगड जिल्हयात जास्त ओबीसी समाज असल्याने याचा फायदा घेण्यासाठी बळीराज सेना पक्ष सुधा आगेकूच करताना दिसतंय, तर येणाऱ्या काळात  हा पक्ष इतिहास घडवून पुढील दहा वर्षात एक दिलाने,एक विचाराने काम करून राज्याचा मुख्यमंत्री बसवेल असा आत्मविश्वास  पक्षाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी माणगाव येथील जनसंवाद दौऱ्यात बोलताना व्यक्त केलाय. त्यामुळे विस्कलटलेल्या कुणबी समाजाला एकत्र आणण्याचा डाव बळीराज सेना करताना दिसत आहे.

रायगड जिल्हयात ओबीसी समाज जास्त संख्येनी असल्याने बळीराज सेना पक्षाने सुरुवातीपासूनच कुणबी जोडो अभियान सुरू ठेवलंय. मात्र त्याचा फारसा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर झालेला दिसला नाही.मात्र प्रवाहाच्या विरोधात मतदान करणारा रायगड जिल्हा यंदा कोणाला कौल देणार हे सुध्दा येणारा निवडणुकांचा काळच सांगेल. ओबीसी समाजाला 1990 सालापासून विधानसभा आणि लोकसभेवर नेहमीचं डावलण्यात आले. त्यामुळे नेतृत्व करण्याची मोठी संधी आमच्याकडुन हिरावून घेतली जाते अशी खोचक टीका आणि नाराजगी अशोक वालम यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हयात बळीराज सेनेकडून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत कोणाला उमेदवारी लढायची असेल तर त्यांनी पक्षाच्या नावाने उभे रहा आपल्याला आपली ताकद कळेल असा सल्ला यावेळी वालम यांनी ओबिसी समाजाला दिलाय यामुळे ओबीसी समाज सुधा पेटून उठला आहे.

एकीकडे सूरु असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसीतून मागत असलेलं आरक्षण वादाच्या भोवऱ्यात आहे, मनोज जारांगे पाटिल आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे सुरू असलेला ओबीसी विरूद्ध मराठा विषय सुध्दा याला मारक ठरणार असल्याची चर्चा आहे. जिल्हयात पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्याचे पहायला मिळत आहेत. तर शिवसेना भाजप यांच्यातील जिल्ह्यात सुरू असलेला अंतर्गत वाद पाहता महाविकास आघाडी प्रामुख्याने या मतदार संघांवर करडी नजर ठेऊन आहे. त्यामुळे ऐन वेळेला कोणता पक्ष कोणासोबत असेल हे आता सांगणे कठीण आहे. जिल्हयात 60 टक्के ओबीसी समाज आहे मात्र अनेक विधानसभा क्षेत्रात ओबीसी समाजाला अद्याप नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही श्रीवर्धन मतदार संघात तर पूर्वी आणि आताच चित्र पाहता मराठा समाजाने नेतृत्व केलेल पहायला मिळतंय. या मतदार संघात 70 टक्के ओबीसी आहे त्यामुळे स्थानिकांना डावललं जातंय असा आरोप पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत न पाहिलेला ट्विस्ट, 2 तासांआधी काय घडलं?
ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत न पाहिलेला ट्विस्ट, 2 तासांआधी काय घडलं?

व्हिडीओ

Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Embed widget