Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू
Pimpri Chinchwad Accident: संपूर्ण पर्यटन आटोपून ते घरी परतत असताना, कोटा जिल्ह्यातील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराडिया ते बालापुरा इंटरचेंज दरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

पिंपरी-चिंचवड: पर्यटनाचा आनंद घेऊन घराकडे परतणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तीन तरुण मित्रांवर (Pimpri Chinchwad Accident) काळाने झडप घातली आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी (१८ मार्च) झालेल्या एका भीषण अपघातात (Pimpri Chinchwad Accident) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची कार पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळल्याने हा थरार घडला.(Pimpri Chinchwad Accident)
Pimpri Chinchwad Accident: मृतांची नावे समोर
१. कुणाल किरण चोरडिया (वय २१, रा. चिंचवडगाव)
२. मयुरेश पांडुरंग पाडाळे (वय २१, रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी)
३. सिद्धांत रमेश आल्हाट (वय २१, रा. आल्हाट वस्ती, वाकड)
हे तरुण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तीन कारमधून लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेले होते. संपूर्ण पर्यटन आटोपून ते घरी परतत असताना, कोटा जिल्ह्यातील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराडिया ते बालापुरा इंटरचेंज दरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
Pimpri Chinchwad Accident: कारचा चक्काचूर; ३० फूट खोल कोसळली गाडी
केथून पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज सिंह सिकरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटलेली कार थेट पुलावरून ३० फूट खाली कोसळली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Pimpri Chinchwad Accident: तो मित्र वाचला, पण बसला मोठा धक्का
या प्रवासात त्यांच्यासोबत असलेल्या एका मित्राला १७ मार्च रोजी अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे तो तातडीने विमानाने घरी परतला होता. तो ज्या कारमधून प्रवास करत होता, त्याच कारचा दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
Pimpri Chinchwad Accident: प्रशासकीय मदतीने मृतदेह शहरात आणणार
खासदार श्रीरंग बारणे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सांगितले की, "हे तरुण काही दिवसांपूर्वी कारगिलमध्ये बर्फवृष्टीमुळे अडकले होते, तेव्हाही त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली होती. आता या अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे. गुरुवारी सकाळी विमानाने या तिघांचे पार्थिव पिंपरी-चिंचवडमध्ये आणले जातील."
आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे चिंचवड, वाकड आणि म्हाळुंगे परिसरात शोककळा पसरली आहे.
























