Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 17 Oct 2021 10:46 AM
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई; उपाआयुक्तांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Pune News : पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपआयुक्त यांचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपआयुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी त्यांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात 3 लाख रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानुसार मध्यरात्री सापळा कारवाईत तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. 

 

नितीन ढगे यांच्यावर सापळा कारवाई केल्यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये ढगे यांच्या घरामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी अद्यापही सुरु आहे.
माझं स्वच्छ मत आहे. आज तुम्ही ईडी, सीबीआय, आयटी काहीही वापरा पण हे सरकार पाच वर्षे सत्तेतून हटणार नाही : शरद पवार

माझं स्वच्छ मत आहे. आज तुम्ही ईडी, सीबीआय, आयटी काहीही वापरा पण हे सरकार पाच वर्षे सत्तेतून हटणार नाही : शरद पवार

2017 पासून भाजपने शहरात केलेली अशी दहा विकास कामं दाखवा, ज्यात भाजपने भ्रष्टाचार केलेला नाही. मी हे आव्हान देतो : खासदार अमोल कोल्हे

महापालिका निवडणुका समोर आहेत म्हणून हा मेळावा भरवला गेलाय का? असा प्रश्न विचारला जातोय. पण याचं उत्तर देताना केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. कृषी कायदे, शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तरी काहीही बोलणार नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. जेव्हा सामान्यांवर अन्याय होत असतो तेव्हा असा ऐंशी वर्षाचा तरुण मैदानात उतरतो. 
पेट्रोल डिझेलची दरवाढ का केली? केंद्रीय मंत्री काय म्हणाले तुम्हाला जी लसीकरण मोफत दिली, त्याचा खर्च पेट्रोल-डिझेल दरवाढीतून काढला जातोय. सत्तर साल मे ऐसा कभी हुवा नहीं, काहीतरी जनतेसाठी सरकारने केले आणि त्याचा खर्च असा कर वाढवून वसूल केला.
2017 पासून भाजपने शहरात केलेली अशी दहा विकास कामं दाखवा, ज्यात भाजपने भ्रष्टाचार केलेला नाही. मी हे आव्हान देतो : खासदार अमोल कोल्हे

अभिनेता, निर्माता अमोल घोडके यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार

कोविड -19 महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांनी कोविड योद्धा म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सामील आहेत.  अभिनेता, निर्माता अमोल घोडके हे असेच एक योद्धे आहेत.  या कठीण काळात ते सर्व गरजू लोकांसाठी अखंडितपणे काम करत होते. अलीकडेच, दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने अशा कोविड योद्ध्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात कौतुक चिन्ह देऊन सत्कार केला. 


या कार्यक्रमात अमोल घोडके यांना कोविड योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजासाठी त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र (प्रमाणपत्र) आणि ₹ 50,000/- रक्कम प्रदान करण्यात आली.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमोल घोडके यांच्या कार्याचे कौतुक करून आणि त्यांना समाजासाठी असेच काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली.  याप्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले की अमोल घोडके आणि त्याच्यासारख्या लोकांमुळे कोव्हीड काळात असंख्य लोकांसाठी गोष्टी सुलभ झाल्या. यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांनी देखील अमोलच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.


याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमोल घोडके म्हणाले की, “मला मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी खरोखरच सर्वांचा खूप आभारी आहे. यापुढे देखील समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी अधिकाधिक समाजोपयोगी काम भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच पुरस्कार रूपाने मिळालेले हे 50,000/- रुपये देखील सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे.  या कार्यक्रमात के.ई.एम रुग्णालयाचे डॉ.हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे डॉ.रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे डॉ.शैलेश मोहिते, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच आणखी काही मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला. 



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याचा आज दुसरा दिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी अनेक लोकार्पण कार्यक्रम पार पाडले. मग पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राज्यातील भाजप नेत्यांना देखील सुनावलं. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पाडली, खासकरून यासाठीच पवार साहेब शहरात आले होते. या बैठकीत सुरुवातीला माजी नगरसेवक, मग आजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पवार साहेबांसमोर सध्य परिस्थिती मांडली. यात पक्षांतर्गत धुसफूस आणि भाजपशी जवळीक साधणाऱ्या पदाधिकाऱ्यांविषयी तक्रारीचा सूर होता. आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असा सावळागोंधळ असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ पसरली असणार हे साहेबांच्या लक्षात आलं. म्हणूनच आज ही मरगळ दूर करून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी पवार साहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजप कडून पुन्हा सत्ता काबीज करायची असल्याने ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी अवलंबून आहे, त्यांच्यात जोश निर्माण करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने आज ते नेमके कोणत्या मुद्द्यावर भाष्य करतात आणि पालिकेच्या सत्तेत असणाऱ्या भाजपला पायउतार करण्यासाठी कोणता कानमंत्र देतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Pune News : वाहतूक पोलिसाला 700 मीटर कारवरून नेलं फरपटत, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News : पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्याला 700 ते 800 मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी प्रशांत श्रीधर कांतावर याला अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड व साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते.त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे. तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली.पुण्यात गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे.

चेन्नई सुपर किंग्ज स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जंगी स्वागत

Pune News : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि यंदाचा ऑरेंज कॅपचा मानकरी ऋतुराज गायकवाड त्याच्या घरी परतला. यावेळी त्याचा साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना भावला. कॅप्टन कुल एम एस धोनीसह अनेक दिग्गजांसोबत त्याने आज मैदान गाजवलं. यंदाच्या आयपीएल मध्ये तर सर्वाधिक धावा करण्याचा मान ही त्यालाच मिळाला, त्याच खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये बाजी मारली. करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून तो पिंपरी चिंचवडच्या घरी परतला तेंव्हा मात्र गाडीतून तो रिकाम्या पायाने उतरला. कारण परंपरेनुसार त्याच्या पायावर पाणी ओतून त्याचं औक्षण केलं जाणार. याची त्याला कल्पना होती, अन त्याला साजेसच तो वागला. यावेळी कुटुंब आणि शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. दुबईवरून तो आज सकाळी पोहचला तेंव्हा साडे सहाची वेळ होती, पण तरी ही ऋतुराजच्या स्वागतासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. फटाके फोडून मिठाई भरवून त्याने आयपीएल गाजविल्याच सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी त्याचा साधेपणा सर्वानाच भावला.

Pune Crime News : दारुसाठी वारंवार पैसे मागूनही ते न दिल्यानं मुलानं केला आईचा खून

Pune Crime News : दारुसाठी वारंवार पैसे मागूनही ते न दिल्याने एका 32 वर्षीय तरुणाने साठ वर्षीय आईचा खून केला. लोखंडी सळई व हातातील कड्याने मारहाणकरून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.


विमल दत्तोपंथ कुलथे (वय 60, रा. नर्हे) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सचिन कुलथे (वय 32) याला अटक केली आहे. याप्रकरणी अनिता चिंतामणी यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पार्श्वभूमी

Pune News LIVE Updates  : पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजलीय : शरद पवार काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरु आहे तिथं मी स्वतः दोन-तीनवेळा जाऊन आलोय. दुर्दैवाने त्या आंदोलनात सामील झालेल्या घटकाबाबत केंद्र सरकारची भूमिका सामंजस्याची आहे असं मला दिसत नाही. त्या आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी, राजस्थान इथले आहेत. त्यात ही पंजाबचाच आकडा जास्त दिसतो. त्यामुळं आमचं केंद्र सरकारला सांगणं असतं की, पंजाबचा शेतकरी अस्वस्थ होऊन देऊ नका, असं पवारांनी म्हटलं. 


पवारांनी म्हटलंय की, पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे. अगदी इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत ही किंमत दिलेली आहे. दुसरीकडे याच पंजाब मधील सर्व शेतकऱ्यांनी अन्न पुरवठ्यासाठी प्रचंड योगदान सतत दिलेलं आहे. या देशाच्या संरक्षणाचा विषय जेंव्हा येतो, तेंव्हा महाराष्ट्रात तुम्ही भाषणं देता. इंच-इंच लढवू म्हणता पण पंजाबच्या सीमेवरील माणूस खऱ्या अर्थाने त्याला तोंड देतो. असा त्याग करणारा घटक काही प्रश्नांसाठी आग्रह धरत असेल, तर त्याकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे, असंही पवार म्हणाले. 


Sharad Pawar on Devendra Fadnavis | माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती असे आरोप करू नका : शरद पवार


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. मात्र, यात त्यांनी चुकीचा आरोप केला. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.


वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावं. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.


'मुख्यमंत्री व्हायचं उद्धव ठाकरेंच्या ध्यानीमनी नव्हतं, मीच त्यांचे हात वर केले', शरद पवारांचं वक्तव्य


काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते पण मीच त्यांचे हात वर केले, असं म्हटलंय. पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.


फडणवीस यांना हात जोडून विनंती...


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. मात्र, यात त्यांनी चुकीचा आरोप केला. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला. वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावं. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.