एक्स्प्लोर

Girish bapat : पुण्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार की गिरीश बापटांची जागा रिक्त राहणार?

भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुन्हा पोटनिवडणूक होणार का? आणि झाली तर उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल? या सध्या शहरात चर्चा सुरु आहे.

Girish bapat : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यामुळे आता त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कसब्याची पोटनिवडणूक राज्यभर गाजली आणि आता पुन्हा पोटनिवडणूक होणार का? आणि झाली तर नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल? याच्या सध्या शहरात चर्चा सुरु आहे. मात्र या पोटनिवडणुकीबाबत कायदे तज्ञांचं काय मत आहे आणि जेष्ठ पत्रकार यांना नेमकं काय वाटतं... पाहूयात!

कायदे तज्ञ उल्हास बापट सांगतात की, खासदार गिरीश बापट यांचं निधननंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. वर्षभरानंतर पुढच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कायद्यानुसार ही पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. 1951 सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणूक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक 2024 मे एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागेल आणि ही निवडणूक 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. विधानसभेची निवडणुकीसारखीच लोकसभेचीही निवडणूक होईल, असंही ते म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले की, कोणत्याही कारणामुळे जागा रिक्त झाली तर त्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्याचप्रमाणे गिरीश बापट यांच्या जागीदेखील पोटनिवडणूक जाहीर होईल. ही पोटनिवडणूक जाहीर झाली तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीप्रमाणेच भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असेल. भाजपकडून ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न होणार नाही मात्र बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. भाजप कायम निवडणुकीसाठी तयार असतात. खासदारकीची निवडणूक असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या निवडणुकीत लक्ष घालतील.

उमेदवार निवडण्याचं आव्हान...

गिरीश बापट यांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका झाल्या तर भाजप आणि महाविकास आघाडी समोर उमेदवाराची निवड हे मोठं आव्हान असणार आहे. विधानसभेच्यावेळी देखील दोन्ही पक्षासमोर उमेदवार निवडीचं आव्हान होतं. त्यानंतर भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला. विरोधकांचा उमेदवार पाहून पक्षाने रणनिती आखली होती. मात्र जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत राजकीय हालचाली संथगतीने सुरु होत्या. त्याच प्रमाणे यावेळीदेखील चित्र बघायला मिळू शकतं. त्यात भाजपकडून काही नावांची चर्चा सुरु झाली आहे आणि ही जागा कॉंग्रेसची असल्यामुळे कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीकडूनदेखील काही नावांची चर्चा आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडून नेमका कोणता उमेदवार दिला जातो त्यात जात आणि धर्मानुसार उमेदवार ठरु शकतो का?, हे पाहणं महत्वाचं असेल.

...तर बिनविरोध होण्याची शक्यता!

अधिक काळ गिरीश बापटांची जागा रिक्त राहणार असेल तर निवडणुका घेणं बंधनकारक आहे. या पोटनिवडणूक जाहीर झाल्या तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट या दोघांना उमेदवारी मिळू शकते मात्र गौरव हे राजकारणात फार सक्रिय नाहीत त्यामुळे स्वरदा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. बापटांच्या घरी उमेदवारी दिली तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते. 

उमेदवारी कोणाला मिळणार?

या पोटनिवडणुकीसाठी उमेवाराची निवड करणं हेच पक्षासमोर मोठं आव्हान असणार आहे. यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचं महिला नेतृत्व म्हणून मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा आहे. तर महाविकास आघाडी किंवा कॉंग्रेसकडून अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे किंवा दोन्ही पक्षाकडून नवीन चेहरा उमेदवार म्हणून घोषित केला जाऊ शकतो.

धंगेकरांना उमेदवारी मिळणार का?

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी निवडुन आल्यानंतर गिरीश बापटांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी धंगेकरांना राजकारणासंदर्भातील सल्ले दिले होते. त्यानंतर गिरीश बापटांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकीय प्रवास करेल, असंही धंगेकर म्हणाले होते. त्यामुळे बापटांनंतर येत्या निवडणुकीत धंगेकरांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र धंगेकरांना कॉंग्रेसकडून खासदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. 

ब्राह्मण फॅक्टर गाजेल का?

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्यावेळी ब्राह्मण फॅक्टर गाजलं होतं. त्याचा फटका भाजपला बसेल असं बोललं गेलं. मात्र त्याप्रमाणे काही घडलं नाही. ब्राह्मण उमेदवार पाहून ब्राह्मण समाज मतदान करतील असा संभ्रम होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा संभ्रम दूर झाला कारण ब्राह्मण मुद्दा समोर ठेऊन उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना पार कमी प्रमाणात मतदान झालं. यावेळी जर भाजपकडून ब्राह्मण उमेदवार दिला तर विरोधीपक्षाकडून ब्राह्मण उमेदवाराचा विचार होण्याची शक्यता आहे. 

 

 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
बारामती तालुक्याला गारपीटीचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान, बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
बारामती तालुक्याला गारपीटीचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान, बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget