एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : संकटं, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई यात गणेशोत्सव एवढे वर्ष कसा टिकला?

Pune Ganeshotsav 2023 : मागील अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सव एवढे वर्ष कसा टिकून राहिला असा प्रश्न पडतो. कार्यकर्ता आणि त्यांनी स्विकारलेले झालेले बदल हे गणेशोत्सव टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचं ठरलं.

पुणे : शिवकालीन, पेशवेकालीन आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणशोत्सव (Ganeshotsav) अनेक संकटं, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत आजही टिकून आहे आणि जल्लोषात साजरा होत आहे. श्रद्धा हा मुद्दा असला तरीही एखादी चळवळ किंंवा काम सुरु करण्यात आणि काही वर्ष ती चळवळ टिकवण्यात अनेकांचा मोठा उत्साह असतो. मात्र काळानुरुप हा उत्साह कमी होतो. मात्र लोकमान्यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा अनेक दशकांनंतरही अजूनही टिकून आणि मोठ्या उत्साहात साजरादेखील होत आहे. गणेशोत्सव टिकून राहण्याची अनेक महत्वाची कारणं देखील आहे. 

गणेशोत्सवाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद सराफ सांगतात की, गणेशोत्सवाची व्यापकता आणि परिवर्तनशीलता हे गणेशोत्सवाचे अंगभूत गुण आहेत. गणेशोत्सवाचे  जनमानसाचा प्रभाव आणि दबाव लक्षात घेऊन परिवर्तन स्वीकारलं आहे. काळाच्या कसोटीवर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था टिकून राहायची असेल तर त्याने काळानुरुप बदल घडवणं आवश्यक असतो आणि गणेशोत्सवाने हा बदल स्विकारला आहे. 

कार्यकर्ता गणेशोत्सवाचा आत्मा असतो. देव, देश आणि धर्माच्या जपणूकीसाठी भारावलेला असतो. त्यात लोकमान्य टिळकांची शिकवण मानणारा हा कार्यकर्ता असतो. काळानुरुप या गणेशोत्सवात झालेले बदल कार्यकर्त्यांनीदेखील सकारात्मकतेने स्विकारले. घर-दार झोकून देत 10 दिवस गणेशोत्सवात समर्पित केलं होतं. 

स्वातंत्र्यानंतरही गणेशोत्सव का टिकून राहिला?

लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य मिळावण्यासाठी लोकांना एकत्र आणणं महत्वाचं वाटलं. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. या माध्यमातून जनजागृती करणे. लोकांना अनेक गोष्टींचं महत्व पटवून देणे आणि ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करणे, हे टिळकांचं ध्येयं होतं. त्यानुसार त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांनी या गणेशोत्सवाला पाठिंबा दिला. त्यानंतर मंडपात लोकं जमू लागली आणि  ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करण्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी भक्कम कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली. हेच कार्यकर्ते या गणेशोत्सवाचा आत्मा बनले या कार्यकर्त्यांनी लोकमान्यांची शिकवण पुढे नेत सगळे बदल स्विकारले आणि गणेशोत्सव साजरे केले.

स्वातंत्र्यानंतर सुराज्याची चळवळ?


स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती हे गणेशोत्सवाचं उद्दिष्ट होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुराज्याच्या चळवळीला सुरुवात झाली. सुराज्याची चळवळ कशी यशस्वी करायची याचा विचार कार्यकर्ते आणि त्यांच्या नेतृत्वाने केला. लोकमान्यांच्या पश्चात विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी विखुरलेलं नेतृत्व एकत्र आणत देशहिताचा विचार केला.  हा विचार करताना कार्यकर्त्यांनी काळानुरुप बदल स्विकारले आणि 2023 मध्येही टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget