एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : संकटं, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई यात गणेशोत्सव एवढे वर्ष कसा टिकला?

Pune Ganeshotsav 2023 : मागील अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सव एवढे वर्ष कसा टिकून राहिला असा प्रश्न पडतो. कार्यकर्ता आणि त्यांनी स्विकारलेले झालेले बदल हे गणेशोत्सव टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचं ठरलं.

पुणे : शिवकालीन, पेशवेकालीन आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणशोत्सव (Ganeshotsav) अनेक संकटं, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत आजही टिकून आहे आणि जल्लोषात साजरा होत आहे. श्रद्धा हा मुद्दा असला तरीही एखादी चळवळ किंंवा काम सुरु करण्यात आणि काही वर्ष ती चळवळ टिकवण्यात अनेकांचा मोठा उत्साह असतो. मात्र काळानुरुप हा उत्साह कमी होतो. मात्र लोकमान्यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा अनेक दशकांनंतरही अजूनही टिकून आणि मोठ्या उत्साहात साजरादेखील होत आहे. गणेशोत्सव टिकून राहण्याची अनेक महत्वाची कारणं देखील आहे. 

गणेशोत्सवाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद सराफ सांगतात की, गणेशोत्सवाची व्यापकता आणि परिवर्तनशीलता हे गणेशोत्सवाचे अंगभूत गुण आहेत. गणेशोत्सवाचे  जनमानसाचा प्रभाव आणि दबाव लक्षात घेऊन परिवर्तन स्वीकारलं आहे. काळाच्या कसोटीवर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था टिकून राहायची असेल तर त्याने काळानुरुप बदल घडवणं आवश्यक असतो आणि गणेशोत्सवाने हा बदल स्विकारला आहे. 

कार्यकर्ता गणेशोत्सवाचा आत्मा असतो. देव, देश आणि धर्माच्या जपणूकीसाठी भारावलेला असतो. त्यात लोकमान्य टिळकांची शिकवण मानणारा हा कार्यकर्ता असतो. काळानुरुप या गणेशोत्सवात झालेले बदल कार्यकर्त्यांनीदेखील सकारात्मकतेने स्विकारले. घर-दार झोकून देत 10 दिवस गणेशोत्सवात समर्पित केलं होतं. 

स्वातंत्र्यानंतरही गणेशोत्सव का टिकून राहिला?

लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य मिळावण्यासाठी लोकांना एकत्र आणणं महत्वाचं वाटलं. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. या माध्यमातून जनजागृती करणे. लोकांना अनेक गोष्टींचं महत्व पटवून देणे आणि ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करणे, हे टिळकांचं ध्येयं होतं. त्यानुसार त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांनी या गणेशोत्सवाला पाठिंबा दिला. त्यानंतर मंडपात लोकं जमू लागली आणि  ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करण्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी भक्कम कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली. हेच कार्यकर्ते या गणेशोत्सवाचा आत्मा बनले या कार्यकर्त्यांनी लोकमान्यांची शिकवण पुढे नेत सगळे बदल स्विकारले आणि गणेशोत्सव साजरे केले.

स्वातंत्र्यानंतर सुराज्याची चळवळ?


स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती हे गणेशोत्सवाचं उद्दिष्ट होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुराज्याच्या चळवळीला सुरुवात झाली. सुराज्याची चळवळ कशी यशस्वी करायची याचा विचार कार्यकर्ते आणि त्यांच्या नेतृत्वाने केला. लोकमान्यांच्या पश्चात विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी विखुरलेलं नेतृत्व एकत्र आणत देशहिताचा विचार केला.  हा विचार करताना कार्यकर्त्यांनी काळानुरुप बदल स्विकारले आणि 2023 मध्येही टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget