Pune Crime News: 'बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर...', पुण्यात धर्मांतरासाठी विवाहितेवर दबाव; शिवीगाळ अन् मारहाण, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दाखवली भीती
Pune Crime News: पुण्यातील समर्थ नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे: पुण्यात 19 वर्षीय विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना ही घटना आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी या विवाहितेवरती दबाव टाकण्यात आला होता. 19 वर्षीय विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या घरातून दबाव टाकण्यात येत होता. 19 वर्षीय विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या प्रकरणी पीडितेनं समर्थनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, घटनेची सगळी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या ननंदेने तिला सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. धर्म स्विकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली. तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला. इतकेच नाही, तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की, 'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस', जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी देखील या 19 वर्षीय विवाहीत महिलेला देण्यात आली होती, त्यानंतर महिलेने पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. एका 19 वर्षीय विवाहीतेला धर्मांतरासाठी तिच्या सासरकडून दबाव टाकण्यात येत होता. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी या विवाहितेवरती दबाव होता. धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने या 19 वर्षीय विवाहित महिलेवर मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आल्याची गंभीर घटना पुण्यात उघडकीस आली आहे. समर्थ पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी ननंद आणि फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या ननंदेने सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव तिच्यावर आणला होता. मात्र महिलेनं धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर तिच्यावर शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. त्याने पीडित विवाहितेला धमकी देत सांगितले की, "तू बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस, आणि जर धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली जाईल," अशी भीती देखील तिला घालत होता. या सततच्या त्रासामुळे पीडित महिलेने अखेर समर्थ पोलीस ठाणे गाठत ननंद व फ्रान्सिसविरोधात गंभीर आरोपांसह तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.






















