एक्स्प्लोर

पुणे एअरपोर्टवर ऑक्टोबर महिन्यापासून पुढील एका वर्षासाठी येणार वेळेच्या मर्यादा

पुणे एअरपोर्ट हा भारतीय वायुदलाच्या जागेमध्येच उभारण्यात आला असून वायूदलाला हवाई पट्टीच्या दुरुस्तीचे आणि विस्तारीकरणाचे काम सुरु करायचे आहे.

पुणे : येत्या 26 ऑक्टोंबर पासून पुणे एअरपोर्टवर पुढील एक वर्ष विमानं सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या कालावधीतच ये जा करू शकतील. एवढंच नव्हे तर पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पुणे एअरपोर्ट संपूर्णपणे बंद ठेवण्याची वेळही येऊ शकते असं पुणे एयरपोर्ट कार्यालयाचे निर्देशक कुलदीपसिंग यांनी म्हटलंय.

पुणे एअरपोर्ट हा भारतीय वायुदलाच्या जागेमध्येच उभारण्यात आला असून वायूदलाला हवाई पट्टीच्या दुरुस्तीचे आणि विस्तारीकरणाचे काम सुरु करायचे आहे. हे काम करण्यासाठी एअरपोर्ट रात्रीच्या वेळी बंद ठेवावा लागणार आहे. पुणे एअरपोर्टला स्वतःची जागा नाही. भारतीय वायुदलाच्या लोहगाव येथील हवाई तळाच्या जागेमध्येच पुणे एयरपोर्ट उभे आहे. हवाई तळाचा एक भाग वायुदलाकडून वापरला जातो तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे असलेल्या दुसऱ्या भागात प्रवासी विमानांची ये जा होत असते. मात्र वायूदलाला त्यांच्या ताब्यात असलेल्या भागात हवाईपट्टीचे विस्तारीकरण आणि दुरुस्ती करायची असल्याने सर्वच विमानांच्या टेक ऑफ आणि लॅंडिगवर मर्यादा येणार आहेत .

गेली अनेक वर्ष पुणे एअरपोर्ट नवीन जागेत सुरु करण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्यानं नवीन एअरपोर्ट उभे राहू शकले नाही . मात्र आता त्याचा परिणाम विमान प्रवासावर होणार आहे. पुण्याच्या शेजारी विमानतळ उभारण्यासाठी आधी चाकणची निवड करण्यात आली होती . परंतु तो प्रकल्प बारगळला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली. परंतु त्याठिकाणी देखील नागरिकांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यानं एअरपोर्टसाठी आवश्यक असलेली जमीन अजूनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही .

1939 साली दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर इंग्रजानी पुण्याजवळील लोहगांव इथं लढाऊ विमानांसाठी हवाई पट्टी तयार केली होती. मुंबईला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यावेळच्या रॉयल एअरफोर्सकडून लोहगावला एअरस्ट्रीप तयार करण्यात आली होती . स्वातंत्र्यानंतर भारतीय वायुदलाने या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी हवाईतळ उभारला. मिग , सुखोई यासारख्या विमानाचं प्रशिक्षण देण्यासाठी हवाईदलाकडून लोहगाव हवाई तळाचा उपयोग केला जातो. वायुदलाला अनेक वर्षांपासून या तळावर दुरुस्ती करायची आहे पण प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या नागरी विमानाचं काय करायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. मात्र आता वायुदलाला हवाईपट्टीच काम करणं गरजेचं बनल्यानं एअरपोर्टवरून ये जा करणाऱ्या विमानांवर निर्बंध घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या निर्बंधांमुळे पुणे एअरपोर्टवर कोणताही परिणाम होणार नाही. विमानांना दिवसाची वेळ टेक ऑफ आणि लॅन्डिंगसाठी उपलब्ध करून दिली जाईल असा दावा पुणे एअरपोर्ट कार्यालयाचे निर्देशक कुलदीपसिंग यांनी केलाय .

मात्र विमानांच्या वेळेवर मर्यादा आल्यास साहजिक त्याचा परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे . विमान प्रवासासाठी पुण्यातील लोकांना मुंबई एअरपोर्टच्या उपयोग करावा लागू शकतो . त्याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्यात पुणे एअरपोर्ट संपूर्णपणे बंद ठेवावा लागल्यास पुणेकरांना मुंबई एअरपोर्टवर पोहचून विमानप्रवास करावा लागेल . या प्रकरणातून धडा घेऊन आता तरी पुण्याच्या नव्या एअरपोर्टच्या उभारणीला वेग येईल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
Pune Crime News: विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
Pune Crime News: झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती, बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती, बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
Loan : पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होणार? आरबीआयकडून नियमांचा ड्राफ्ट जारी
एप्रिल 2027 पासून 62 टक्के लोकांना गृह आणि वाहन कर्ज मिळणं अवघड होणार, आरबीआयच्या नियमामुळं काय काय बदलणार?
SIP Investment: एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवाल, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?
एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवाल, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
Embed widget