Neelam Gorhe : राज्य महिला आयोगाने 'ती' गोष्ट केली असती तर.... नीलम गोऱ्हेंची रुपाली चाकणकरांच्या वकुबावर शंका घेणारी टिप्पणी
Vaishnavi Hagawane Pune Crime: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आयोगाच्या कार्यात जसं सामाजिक संस्थाना जोडले होते त्याच पद्धतीने सध्याच्या अध्यक्षांनी करायला हवं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुणे : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आई आणि वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला आयोगाची कार्यपद्धती, महिला आयोगानं कशा प्रकारे काम करायला हवं या संदर्भात भाष्य केलं.नीलम गोऱ्हे यांनी न्याय संस्थेकडे पोहोचत असताना, पोलीस स्टेशन, दिवाणी स्वरुपाचा कौंटुबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, बाकीच्या निर्वाहासाठी असलेल्या योजना अशा अनेक भाग आहेत,असं म्हटलं.
महिला आयोगाच्या सदस्यांची नेमणूक व्हावी
राज्य महिला आयोगाचं काय चूक आणि बरोबर हे ट्रायल बाय मीडिया, ट्रायल बाय सोसायटी होऊ नये, मात्र, ते जे काही काम करत आहेत, त्यात अजून काही तज्ज्ञ लोकांकडून अनुभवी लोकांना विश्वास घेऊन त्या सामाजिक संस्था महाराष्ट्रात ज्या 100-200 आहेत ज्या संस्था विजया रहाटकर जोडून घेतल्या होत्या, त्यांना सातत्यानं या कामात विश्वास वाटेल यासाठी बैठक घेतली पाहिजे. सध्याच्या महिला अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणं आवश्यक आहे आणि अद्यापही महिला आयोगावरील सदस्यांची पदं देखील रिक्त असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिलं.
महिला आयोगाने 'हे' करायला हवं होतं - नीलम गोऱ्हे
राज्य महिला आयोगाने जसं पोलिसांना सांगितले तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. पोलिसांनी केलं नाही हे ब्लेम गेम पेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणे सगळ्यांनी मिळून वाढवणं गरजेचं आहे. मीडिया, आम्ही, महिला संघटना सगळे आलो, सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
वरिष्ठ स्तरावरील अधिकारी कार्यक्षम असले तरी पोलीस स्टेशन स्तरावर संवेदनहीनता असावी. नाशिकमध्ये मी काल होते माडीवाले नावाच्या एका मुलीची आत्महत्या झाली. परदेशी नावाचे पीआय आहेत, आई वडिलांना सांगितलं काळजी घेतो, प्रत्यक्षात केस नोंदवून घेतली. नवरा, सासू, सासरे फरार म्हणजे या केसला काय अर्थ आहे. नाशिकच्या सीपींना त्याबाबत निर्देश दिले.
सगळ्या पोलीस दलावर टीका करुन पोलीस दलाचं नीतीधैर्य खच्ची करु नये. काही ठिकाणी आम्हाला असं दिसलंय की वरिष्ठ स्तरावरचे सीपी आणि एसपी सोडून काही ठिकाणी असं दिसलंय, काही लोकांनी तक्रार केली आहे काही पोलीस स्टेशनला आर्थिक दृष्ट्या बाहुबलींनी वर्चस्व मिळवलं आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
Before You Go
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव





















