एक्स्प्लोर

Corona Vaccination : ...तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती : अजित पवार

कोरोना लसीच्या तुटवड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. "लस आधी परदेशात पाठवायची काय गरज होती? जर पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती. पण जे झालं ते झालं," असं अजित पवार म्हणाले.

मुंबई : "भारतात सुरुवातीला तयार होणारी लस आधी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती. जर ती पाठवली नसती तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असं माझं स्पष्ट मत आहे. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी कौन्सिल हॉलला बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञ सांगत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. परदेशातून लस आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली तर खूप बरं होईल. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या दोन्ही कंपन्यांकडून लस बनवण्याची क्षमता पाहता, भारतातील लसीकरण व्हायला बराच कालावधी लागेल.

लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. त्याचा उपयोग होत आहे. इतर देशातील आकडेवारी पाहता हे लक्षात येतं. इस्रायल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हाच एक कार्यक्रम व्यवस्थित राबवावा लागेल. एकमेकांना मदत करुन लवकरात लवकर हे पार पाडूयात, असं अजित पवार म्हणाले.

"ही राजकीय टीकाटिप्पणी करण्याची वेळ नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पण जे झालं ते झालं. आधी याला सामोरं जाऊ. नागरिकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. त्यांचे जीव वाचवण्याला प्राधान्य देऊ," असं ते म्हणाले.

दरम्यान देशातील कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, "देशात जी लस तयार होते, तो केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्याचं वाटपही केंद्र सरकार करते. न्यायालय देखील यावर लक्ष ठेवून आहे. तेही वेगवेगळे आदेश देत आहेत. न्यायालयाने गांभीर्याने घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काय चर्चा सुरु आहे ती राहू दे."

अजित पवार पुढे म्हणाले की, "आधी परदेशात लस पाठवायची काय गरज होती? लस आधी परदेशात पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी."

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणजे लॉकडाऊन : अजित पवार 
15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त असेल तर बेड्सची कमतरता भासणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget