एक्स्प्लोर

Corona Vaccination : ...तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती : अजित पवार

कोरोना लसीच्या तुटवड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. "लस आधी परदेशात पाठवायची काय गरज होती? जर पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती. पण जे झालं ते झालं," असं अजित पवार म्हणाले.

मुंबई : "भारतात सुरुवातीला तयार होणारी लस आधी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती. जर ती पाठवली नसती तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असं माझं स्पष्ट मत आहे. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी कौन्सिल हॉलला बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञ सांगत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. परदेशातून लस आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली तर खूप बरं होईल. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या दोन्ही कंपन्यांकडून लस बनवण्याची क्षमता पाहता, भारतातील लसीकरण व्हायला बराच कालावधी लागेल.

लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. त्याचा उपयोग होत आहे. इतर देशातील आकडेवारी पाहता हे लक्षात येतं. इस्रायल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हाच एक कार्यक्रम व्यवस्थित राबवावा लागेल. एकमेकांना मदत करुन लवकरात लवकर हे पार पाडूयात, असं अजित पवार म्हणाले.

"ही राजकीय टीकाटिप्पणी करण्याची वेळ नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पण जे झालं ते झालं. आधी याला सामोरं जाऊ. नागरिकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. त्यांचे जीव वाचवण्याला प्राधान्य देऊ," असं ते म्हणाले.

दरम्यान देशातील कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, "देशात जी लस तयार होते, तो केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्याचं वाटपही केंद्र सरकार करते. न्यायालय देखील यावर लक्ष ठेवून आहे. तेही वेगवेगळे आदेश देत आहेत. न्यायालयाने गांभीर्याने घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काय चर्चा सुरु आहे ती राहू दे."

अजित पवार पुढे म्हणाले की, "आधी परदेशात लस पाठवायची काय गरज होती? लस आधी परदेशात पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी."

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणजे लॉकडाऊन : अजित पवार 
15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त असेल तर बेड्सची कमतरता भासणार नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Embed widget