Devendra Fadnavis : चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? समाज म्हणून आपण... लोहगड केसवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Maharashtra Crime : नसरापूर प्रकरणात न्यायालयाने विक्रमी वेळेत सुनावणी पूर्ण केली असून आरोपीला शिक्षा होणार आहे. अशा प्रकरणांमध्ये यापुढे जलदगतीने न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : लोहगडावरुन ढकलून हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) केस प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. अशा शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? यामागे सामाजिक अँगल तपासला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी (Devendra fadnavis) दिली. त्याचवेळी नसरापूर प्रकरणात (Nasrapur Case) न्यायालयाने जलदगतीने तपास पूर्ण केला असून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पुण्यातील लोहगड केसमध्ये (Lohagad Crime) केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला पोलिसांनी अटक केली आहे.
लोहगड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना खरोखरच अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरच्या मुलांमध्ये अशी सूडबुद्धी का तयार होते? यामागे गुन्हेगारीसोबतच सामाजिक अँगल तपासला गेला पाहिजे.
CM On Nasrapur Case : नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंड होणार
नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. येत्या 29 जून रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नसरापूर प्रकरण हे दुर्मिळ प्रकरण असून दोषीला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे, ती न्यायालय मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस सुरू चालवली आणि विक्रमी वेळेत निकाल दिला. या केसमुळे पुन्हा अशा घटना घडल्या तर त्यामध्ये जलदगतीने शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
Nasrapur Case : नसरापूरमध्ये काय घडलं?
पुण्यातील नसरापूरमध्ये 1 मे 2026 रोजी 65 वर्षीय नराधमानं साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली होती. महाराष्ट्र पुन्हा एका पाशवी अत्याचारानं हादरला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आरोपीला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीनं बलात्कार करुन हत्या केल्याचं कोर्टानं म्हटलं. मात्र न्यायाधीशांनी आरोपीला 'तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे' असं विचारलं तेव्हा आरोपीनं पुन्हा खोटं बोलून बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी 15 दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. याप्रकरणी तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे केवळ दोन महिन्यात निकाल लागणारा हा राज्यातील सर्वात वेगवान ऐतिहासिक खटला ठरला आहे. त्यामुळे चिमुरडीचे हालहाल करुन तिचे लचके तोडणाऱ्या हैवानाला फाशी होणार की नाही याचं उत्तर 29तारखेलाच मिळेल.
ही बातमी वाचा:
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले






















